Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्याने चक्क जनावरांना खाऊ घातला २० टन कांदा; काय आहे कारण?

हिंगोलीतील औंढा तालुक्यातील उमरा गावातील शेतकाऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने रागाच्या भरात आपल्या शेतातील आपला २० टन कांदा जनावरांना खाऊ घातला आहे. इतका मोठ्या प्रमाणात कांदा हा शेतकऱ्याने जनावारांना खाऊ घातल्याने सचिन बोंगाने या शेतकऱ्याची चर्चा संपूर्ण हिंगोलीत सुरू झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 23, 2022 | 05:05 PM
शेतकऱ्याने चक्क जनावरांना खाऊ घातला २० टन कांदा; काय आहे कारण?
Follow Us
Close
Follow Us:

हिंगोली : शेतकऱ्यांना कांद्याने रडवायला सुरुवात केली आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. कांद्यातून खरिपाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च मिळेल अशी आशा शेतकरी बांधवांना असते. दरवर्षी खरिपाच्या पेरणीसाठी लागणारा खर्च मिळून देणाऱ्या कांदा पिकाने यंदाच्या वर्षी मात्र शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. त्यामुळे हिंगोलीसहित राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

चार महिने शेतात कष्ट करून शेकडो क्विंटलचे उत्पादन घेतलेल्या कांद्याला सद्यस्थितीत कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळं हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील उमरा गावातील एका शेतकऱ्याने आपल्या शेतातील कांदा जनावरांच्या पुढे टाकला आहे. सचिन बोंगाने असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

हिंगोलीमधील कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे. खरिपाच्या पेरणीचा खर्च यंदाच्या कांद्यातून निघेल अशी हिंगोलीतील अनेक शेतकऱ्यांना होती. मात्र, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्याने पाणी आणले आहे. शेतकऱ्यांना कांद्याचे क्विंटल उत्पादन घेऊनही भाव मिळत नसल्यानं आर्थिक फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांना दरवर्षी कांद्यातून खरिपाच्या पेरणीचा खर्च मिळतो. मात्र, यंदाच्या वर्षी खरिपाच्या पेरणीचा खर्चही कांद्यातून मिळत नसल्याने कांदा पिकाने शेतकऱ्यांना रडवलं आहे.

दरम्यान हिंगोलीतील औंढा तालुक्यातील उमरा गावातील शेतकाऱ्याने कांद्याला भाव मिळत नसल्याने रागाच्या भरात आपल्या शेतातील आपला २० टन कांदा जनावरांना खाऊ घातला आहे. इतका मोठ्या प्रमाणात कांदा हा शेतकऱ्याने जनावारांना खाऊ घातल्याने सचिन बोंगाने या शेतकऱ्याची चर्चा संपूर्ण हिंगोलीत सुरू झाली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आल्याचे पाहायला मिळत आहे.

सचिन बोंगाने हे शेतकरी असून हिंगोली जिल्ह्यात शेती करतात. त्यांनी आपल्या दोन एकर शेतामध्ये या कांद्याची लागवड केली होती. आतापर्यंत या कांदा पिकावर ८१ हजार रुपये एवढा खर्च आला होता. पंधरा दिवसांपूर्वी त्यांनी शेतामधील कांदा पीक काढून ते विक्री करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यासह परजिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गेले. त्यावेळी त्यांना कांदा पिकाच्या दराची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना बाजारात कांदा दोन ते चार रुपये प्रति किलो दराने विक्री होत असल्याचं त्यांना समजलं. दोन ते चार प्रति किलो दराने कांदा विक्री होत असल्यानं शेतकरी सचिन बोंगाने यांचा हिरमोड झाला.

[read_also content=”आयपीएल सामन्यावेळीच घेतला सट्टा; एकाला अटक https://www.navarashtra.com/maharashtra/betting-on-ipl-matches-one-arrested-nrdm-283559.html”]

शेतकरी बोंगाने यांना कांद्याचे भाव वाढतील आणि खरिपाच्या पेरणीचा खर्च निघेल अशी आशा त्यांना होती. या आशेवर त्यांनी मागच्या पंधरा दिवसांपासून स्वतः राहत असलेल्या शेतातील घरामध्ये कांद्याची साठवणूक केली होती. परंतु दररोज कांद्याचे भाव घसरत असल्याने आज बोंगाणे यांनी रागाच्या भरात संपूर्ण २० टन कांदा हा त्यांच्या जनावरांना खाऊ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

Web Title: The farmer fed 20 tons of onion to the animals what is the reason nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2022 | 05:05 PM

Topics:  

  • Agriculture Minister Dada Bhuse
  • cmomaharashtra
  • narendra modi
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Middle East Conflict : मोदींचा एक फोन अन् युद्ध थांबणार! Iran-Israel युद्धावर ‘या’ देशाच्या बड्या अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
1

Middle East Conflict : मोदींचा एक फोन अन् युद्ध थांबणार! Iran-Israel युद्धावर ‘या’ देशाच्या बड्या अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा
2

भारत बनला ‘अब्जाधीशांचा कारखाना’! दर आठवड्याला एक नवा अब्जाधीश, Hurun रिपोर्टचा दावा

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद
3

Thane News: वाहनचालकांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर वाहतुकीचे निर्बंध, मेट्रो-१२ कामामुळे ‘या’ वेळेत रस्ता बंद

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी
4

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.