
devendra fadnavis and eknath shinde
औरंगाबाद : सत्ता हातातून निसटत असताना ठाकरे सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबादच्या (Usmanabad) नामातंरचा निर्णय घेतला. या निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच नाव दि. बा. पाटील करण्यावरही स्थिगीती आणली आहे. हे तिनही नामातंरचे निर्णय शिंदे सरकार नव्याने घेणार असल्याची माहिती आहे.
[read_also content=”नवी मुंबईत शिवसेनेचे आणखी ५ नगरसेवक शिंदे गटात सामील https://www.navarashtra.com/maharashtra/5-more-shivsena-corporators-join-shinde-group-in-navi-mumbai-nrgm-304343.html”]
ठाकरे सरकार कोसळण्यापुर्वी 29 जूनला ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक झाली. या बैठकीत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामातंराच्या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलं होतं तर अनेक ठिकाणी या निर्णयाला विरोध झाला होता. तर, राज्यपालांनी बहुमत चाचणी सिद्ध करायचं पत्र दिल्यानंतर असा धोरणात्मक आणि लोकप्रिय निर्णय घेता येत नसल्याचा आक्षेप घेत नामांतराला स्थगिती दिली आहे. याआधीही हाच मुद्दा पुढे करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आक्षेप घेतला होता.
[read_also content=”उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट https://www.navarashtra.com/maharashtra/devendra-fadnvis-will-meet-raj-thackeray-at-shivthirth-nrps-304342.html”]