Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात लिंबाना मोठी मागणी, एक लिंबूसाठी मोजावे लागणार १० ते १५ रुपये

भारतामध्ये सर्वाधिक लिंबू पिकवले जातात. सध्या राज्यातील वातावरणात चांगलीच उष्णता जाणवत आहे. उन्हाळा वाढल्यानंतर सगळीकडे लिंबूला मोठी मागणी असते. या दिवसांमध्ये लिंबाचे सरबत, ऊसाचा रस यांसारखे थंड पेय पिले जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2024 | 03:41 PM
बाजारात लिंबाना मोठी मागणी, एक लिंबूसाठी मोजावे लागणार १० ते १५ रुपये
Follow Us
Close
Follow Us:

सध्या राज्यातील वातावरणात चांगलीच उष्णता जाणवत आहे. उन्हाळा वाढल्यानंतर सगळीकडे लिंबूला मोठी मागणी असते. या दिवसांमध्ये लिंबाचे सरबत, ऊसाचा रस यांसारखे थंड पेय पिले जातात.त्यामुळे बाजारात लिंबाना मोठी मागणी आहे. मागणी वाढल्याने लिंबाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. घाऊक बाजारात दर वाढले आहेत. घाऊक बाजारामध्ये १ किलो लिंबुसाठी १५० ते १७० रुपये किंमत मोजावी लागत आहे तर किरकोळ बाजारात एका लिंबाचा दर १० ते १५ रुपये आहे. भारतामध्ये सर्वाधिक लिंबू पिकवले जातात.

उन्हाळा वाढल्यानंतर लिंबाच्या मागणीमध्ये वाढ होते. एप्रिल मे महिन्यात हे दर आणखीन वाढत जातात. त्यामुळे जूनपर्यंत लिंबूचे दर वाढलेले राहणार आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. वाढत्या किंमतीमुळे लिंबू खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना १ किंवा २ लिंबू घ्यावे लागत आहेत. लिंबूला सर्वच दिवसांमध्ये मोठी मागणी असते. लिंबूचे अनेक आरोग्यदायी गुणकारी फायदे आहेत. मात्र लिंबूला उन्हाळ्यात सगळ्यात जास्त मागणी असते.

तापमानात वाढ झाल्याने थंड काहीतरी पिण्याची सगळ्याचं इच्छा होते. अश्यावेळी प्रत्येक घरामध्ये लिंबू सरबत बनवले जाते. त्यामुळे लिंबूला मोठी मागणी आहे. मार्च महिना सुरु झाल्यानंतर लिंबूचे दर सतत वाढत आहेत. मार्चमध्ये एक शेकडा लिंबू १२५ ते १५० रुपयांदरम्यान मिळत होते. तर आता त्यात वाढ झाली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये लिंबूला थोडी कमी मागणी असते. पण उन्हाळा सुरु झाल्यानंतर लिंबूच्या दरात वाढ होते.

बाजारामध्ये लिंबूच्या आकारानुसार त्याचे दर ठरवले जातात. सगळ्यात लहान आकाराच्या लिंबूला १० रुपये दर मिळतो तर आकाराने मोठ्या असलेल्या लिंबूला १५ रुपये एवढा दर मिळतो. काही ठिकाणी लिंबू आकाराने लहान असले तर १० रुपयांना ३ लिंबू असे विकले जातात. उन्हाळा संपेपर्यंत लिंबूला बाजारात मोठी मागणी असल्याने लिंबूच्या भावामध्ये सतत चढ उतार होत आहे. बदलत्या हवामानाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. तापमानात बदल झाल्यानंतर फळबागा, भाजीपाला यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात लिंबूची अवाक झाल्याने भाव वाढले आहेत.

Web Title: There is a huge demand for lemons in the market one lemon costs 10 to 15 rupees lemon maharashtra farmer nrsk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2024 | 03:41 PM

Topics:  

  • Lemons
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

हुडहुडी कमी होणार! पण तापमानातील ‘हा’ खेळ कसा असणार? ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप
2

काळोखे हत्या प्रकरणात सुधाकर घारेंच्या विरोधात षडयंत्र, शिवसेना उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांचा महेंद्र थोरवे यांच्यावर आरोप

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती
3

Dharashiv Airport : धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ , आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
4

जिल्हा परिषद निवडणूक कधी? आचारसंहिता कधी लागणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.