Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग

चंदगड तालुक्यातील तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पावसाळ्यात तिलारी घाटातून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 21, 2024 | 12:27 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापुर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणारा तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तिलारी घाटातील संरक्षक कठडे जीर्ण आणि नादुरुस्त आहेत. तसेच कोल्हापुरच्या चंदगड तालुका आणि तिलारी घाटात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत तिलारी घाटातून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. या मार्गातून एसटी बसची वाहतूक सुध्दा सुरु असते. त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर शासनाने तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळविण्यात येणार आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी तिलारी घाटाऐवजी आंबोली आणि चोर्ला या मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोल्हापुरच्या चंदगड तालुका आणि तिलारी घाटात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात तिलारी घाटातून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. तिलारी घाटातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते. ही वाहने बेळगांव, शिनोळी, पाटणे फाटा, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, हेरे, मोटणवाडी, तिलारीनगर या मार्गावरुन येतात. तसेच बेळगांव, कर्नाटक येथुन गोव्याला जाणारा जवळचा रस्ता तिलारी घाटातुनच जातो. त्यामुळे या घाटातून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. तिलारी घाटाचा मार्ग अवजड वाहनांसाठी अरुंद आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. काही वेळा अरुंद रस्त्यामुळे अवजड वाहने तिलारी घाटाच्या मार्गावरच अडकून राहतात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होतो.

अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे दुचाकी आणि चारचाकी वाहनांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे वाहन चालकांना आणि प्रवाशांना धोका निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने तिलारी घाट ३१ ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अवजड वाहनांनी वाहतुकीसाठी तिलारी घाटाऐवजी आंबोली घाट आणि कर्नाटक राज्यातील चोर्ला या मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. संकेश्वर-गडहिंग्लज-आजरा- आंबोली ते बांदा या महामार्गाचे काम ३१ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.

Web Title: Tilari ghat closed for heavy traffic till october 31 learn about alternative ways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • kolhapur
  • Marathi News

संबंधित बातम्या

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन
1

Pandharpur : थकीत ऊस बिलासाठी कृषिराज शुगर्सचे चेअरमन गणेश पाटलांच्या घरासमोर आंदोलन

रत्न–दागिन्यांच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड; ‘जेम अँड ज्वेलरी शो’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन
2

रत्न–दागिन्यांच्या पारंपरिक संस्कृतीला आधुनिकतेची जोड; ‘जेम अँड ज्वेलरी शो’चं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला
3

Pratap Sarnaik : अंजली दमानिया प्रकरणावरून प्रताप सरनाईकांचा रोहित पवारांना टोला

ठाणेकरांनो आरोग्य तपासणी करुन घ्या, पालिकेचं नागरिकांना आवाहन; महिला व बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर
4

ठाणेकरांनो आरोग्य तपासणी करुन घ्या, पालिकेचं नागरिकांना आवाहन; महिला व बालकांसाठी मोफत आरोग्य शिबिर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.