Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसर्गाचा लहरीपणा, नापिकी, कर्जबाजारीने शेतकरी मेटाकुटीला; नांदेड जिल्ह्यात १४५ बळीराजांनी संपवले जीवन

जिल्ह्यातील काही मोजक्या तालुक्याचा अपवाद वगळता शेती निसर्ग पावसाच्या लहरीपणावर मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. पावसाचा खंड पडला की पीकांचे पोषण व वाढ होत नाही.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 19, 2025 | 05:47 PM
Uncertain rains and loans led to increase in farmer suicides in Nanded district

Uncertain rains and loans led to increase in farmer suicides in Nanded district

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. गंगाधर तोगरे : कंधार : निसर्गाचा लहरीपणा, नापिकी आणि कर्जबाजारी आदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी आपले जीवन आत्महत्या करून संप विण्याचा मार्ग पत्करला. नांदेड जिल्ह्यात २४ डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत १४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती जिल्हास्तरीय कार्यालयाच्या प्राप्त प्राथमिक अहवालातून समोर आली आहे. सर्वाधिक शेतकरी आत्महत्या जिल्ह्यातील लोहा तालुक्यात १९ व हदगाव तालुक्यात १७ अशी संख्या आहे.
जिल्ह्यातील काही मोजक्या तालुक्याचा अपवाद वगळता शेती निसर्ग पावसाच्या लहरीपणावर मोठ्या प्रमाणात विसंबून आहे. पावसाचा खंड पडला की पीकांचे पोषण व वाढ होत नाही.

अतिवृष्टी व सततचा पाऊस झाल्यास पीकाचे अतोनात नुकसान होते. पाऊस योग्य झाला अन् पीकाचा उतारा चांगला आला तरी मालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत, लागवड, संगोपन, काढणी, मळणी आदीवर झालेला खर्च व उत्पन्नाचे गणित जुळत नाही. मग शेतकऱ्यांचे अर्थकारण विस्कळीत होऊन आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. निर्माण झालेल्या आर्थिक चणचणीमुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह, पाल्याचे शिक्षण, लग्न आदीचा खर्च भागवायचा, कसा? कर्जफेड करायची कशी? आर्थिक चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांनी करायचे काय ? अशा नानाविध विचारांचे काहूर निर्माण होते आणि नैराश्यातून आपले जीवन विषारी औषध प्राशन करून, गळफास घेऊन, रेल्वेखाली पडून विजेच्या तारेला पकडून, विहीर, नदी, तलावात उडी मारून आदीने शेतकरी आत्महत्या करतो. जिल्हयात १४५ शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २० २५ या कालावधीत आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गळफास घेऊन, रेल्वेखाली पडून विजेच्या तारेला पकडून, विहीर, नदी, तलावात उडी मारून आदीने शेतकरी आत्महत्या करत आहे. जिल्हयात १४५ शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२४ ते ३० ऑक्टोबर २० २५ या कालावधीत आत्महत्या केल्या असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील १४५ शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणात समितीने ८३ प्रस्ताव पात्र ठरविले आहेत. आणि ८ प्रस्ताव अपात्र केले आहेत. प्रलंबित असलेले प्रस्ताव ५४ असल्याचे समजते. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या केलेली सर्वाधिक संख्या लोहा तालुक्यात १९ असून हदगाव तालुक्यात १७ संख्या आहे. जिल्ह्यात सर्वात कमी संख्या धर्माबाद तालुक्यात अवधी १ आहे. आणि उमरी ३ व देगलूर तालुक्यात सुद्धा ३ संख्या आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मन्याडखोऱ्यात २६ शेतकऱ्यांची आत्महत्या

मन्याडखोरे बालाघाट डोंगराच्या नैसर्गिक टेकड्या, माळरानावर कंधार व लोहा तालुका वसलेला आहे. निसर्ग शेतीवरच शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून आहे. निसर्ग अति पावसामुळे शेती पीकाचे नुकसान होते. तसेच कमी पावसाने पीक वाढ, उतारा योग्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. आणि आर्थिक चणचणीने शेतकरी आर्थिक चक्रव्यूहात अडकून शेती व्यवसायावर विपरीत परिणाम होतो. अशा नैराश्यातून शेतकरी आत्महत्या करतो. त्यामुळे मन्याडखोऱ्यातील लोहा तालुक्यात १९ व कंधार तालुक्यात ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

Web Title: Uncertain rains and loans led to increase in farmer suicides in nanded district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 05:47 PM

Topics:  

  • Farmer Suicide
  • maharashtra farmers
  • nanded news

संबंधित बातम्या

Local Body Elections : स्वप्न पाहणाऱ्यांना मतदार जमिनीवर आणणार? नांदेडमध्ये निवडणुकीचा उत्साह शिगेला
1

Local Body Elections : स्वप्न पाहणाऱ्यांना मतदार जमिनीवर आणणार? नांदेडमध्ये निवडणुकीचा उत्साह शिगेला

Maharashtra Politics : प्रचारामळे बेरोजगारांना आले ‘अच्छे दिन’! पाचशे रुपये अन् अल्पोपहाराने सन्मान
2

Maharashtra Politics : प्रचारामळे बेरोजगारांना आले ‘अच्छे दिन’! पाचशे रुपये अन् अल्पोपहाराने सन्मान

Railway News : सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; २५.६५ लाखांचा हरवलेला माल प्रवाशांना परत
3

Railway News : सुरक्षा दलाची उल्लेखनीय कामगिरी; २५.६५ लाखांचा हरवलेला माल प्रवाशांना परत

आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले
4

आठ वर्षांनी अवतरले राजकीय नेते! समस्यांच्या याद्या वाचून मतदारांनी जागेवरच टोकले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.