Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले...

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 01, 2025 | 04:32 PM
अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट (फोटो सौजन्य-X)

अवकाळीने बिघडवले उन्हाळ कांद्याचे गणित, 9 दिवसात 1 हजार हेक्टरवरील अधिक रोपे नष्ट (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

  • कांदा उत्पादकांचे गणित बिघडल्याची माहिती समोर
  • उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे
  • सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान
नाशिक : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे उन्हाळ कांदा रोपांचे नुकसान झाल्याने कांदा उत्पादकांचे गणित बिघडल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र कमी होणार आहे. सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यभरात थैमान घातले. यात ऑक्टोबर महिन्यात सुरु असलेल्या अवकाळी पावसाची आणखी भर पडली आहे. अवकाळीच्या या तडाख्यात जिल्ह्यातील मका, सयोबीन पिकांसह उन्हाळी कांदा रोपांचे नुकसान झाले. ऑक्टोबरच्या अवकाळी पावसात गत ९ दिवसात १ हजारहून अधिक हेक्टरवरील कांदा रोप पाण्याखाली गेले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Maharashtra Rain Alert: दारं खिडक्या लावून घ्या! राज्यावर येणार भलंमोठं संकट; IMD चा इशारा काय सांगतो?

मागील महिन्यात देखील अतिवृष्टीने रोपांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हाती कांद्याचे रोपच शिल्लक नसल्याने लागवडीसाठी रोप आणणार कोठून असा प्रश्न पडला आहे. शेतकऱ्यांनी आता उन्हाळ कांद्याचे नवीन बियाणे तयार करायचे ठरवल्यास जमिनीचा वाफसा होण्यासाठी किमान २० दिवसांचा कालावधी लागणार आहे, वाफसा झाल्यानंतर पेरणी केलेले बियाणे फेब्रुवारी महिन्यात लागवडीस येणार आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यात कांदा पिकाच्या वाढीसाठी आवश्यक आणि पोषक ठरणारी थंडी नसते. एकूणच या सर्व परिस्थितीचा विचार करता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळ कांद्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर घटण्याची चिन्हे आहेत.

लागवड कमी होऊन उत्पादन घटणार

अतिवृष्टी आणि अवकाळीने कांदा रोपे जवळपास पूर्णतः नष्ट झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत पुन्हा महागाचे कांदा बियाणे आणून रोप तयार करण्याची मानसिकता शेतकऱ्याऱ्यांची राहिलेली नाही. याशिवाय आता टाकलेले बियाणे फेब्रुवारीत लागवडीस येईल. या महिन्यात थंडी जास्त नसते. परिणामी उत्पादन घटणार. १ एकर लागवडीसाठी ५० हजार रुपयांचा खर्च येतो. आधीच शेतकरी आर्थिकदृष्टया संपूर्ण कोलमडला असून आता पैसे कुठून आणणार? असा सावाल शेतकरी नेते राजेंद्र डोखळे यानी व्यक्त केला.

उपलब्ध कांद्याचा दर्जा घसरला

यंदा सततच्या पावसामुळे चाळ्यामध्ये ओलसरपणा शिरला, त्यामुळे कांद्याचे कुजणे आणि अंकुर फुटणे सुरू झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी चाळ्यांची छपरे गळत असल्याने आणि हवामान दमट झाल्याने कांद्याचा दर्जा घसरला आहे. परिणामी, बाजारात दर्जानुसार दरात मोठी तफावत निर्माण झाली आहे.

निर्यात प्रभावित होणार

अतिवृष्टीमुळे उत्पादनात घट होऊन उन्हाळ कांद्याचा पुरवठा कमी होणार आहे. देशातील बहुतांश बाजारात कांद्याचा पुरवठा नाशिक, नगर, लासलगाव, येवला या बाजार समित्यामधून केला जाती, यंदा या भागातील उत्पादन घटून देशातील कांदा निर्यातवरही प्रभाव पडणार आहे. असे झाल्यास केंद्र सरकार अंतर्गत पुरवठा प्राधान्याने सुरु ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कांदा आयात करेल. परिणामी भाव देखील कोसळणार आहे. त्यामुळे, शेतक-यांसाठी सध्याची परिस्थिती ही दुहेरी संकटासारखी झाली आहे.

MVA-MNS Mumbai Morcha: बोगस मतदान, मतपेटीचा घोळ झाला तर…; ठाकरे गटाच्या नेत्याची खुली धमकी

Web Title: Untimely rain has damaged the summer onion crop destroying over a thousand hectares of plants in 9 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 04:31 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर
1

महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर उपवासाचे पदार्थ महाग; सध्याचे दर जाणून घ्या सविस्तर

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
2

Nashik News : मिलिंदनगरच्या २८ घरांवर जेसीबी, सहा तास चालली कारवाई; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन
3

चर्नी रोड -गिरगाव पुलाला विरोध करणाऱ्या सैफी हॉस्पिटल व्यवस्थापनाच्या विरोधात स्थानिकांचे आंदोलन

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार
4

पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; लवकरच सांस्कृतिक धोरणाबाबतचे निर्णय जाहीर होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.