
लोकल प्रवासावर हिंसाचाराचे सावट! किरकोळ संभाषणही सहन होईना, समाज पोहोचला 'टिपिंग पॉइंट' वर
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल रेल्वेचा प्रवास आता अधिक असुरक्षित होत चालला आहे. धावत्या लोकलमध्ये प्राध्यापकांवर झालेला जीवघेणा हल्ला आणि मयंक लोहार हत्या प्रकरण ताजे असतानाच, बुधवारी रात्री नऊ वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत अवघ्या १२ तासांत उपनगरीय रेल्वेत चार धक्कादायक घटना घडल्या. या सर्वांची सुरुवात किरकोळ वादातून झाली आणि त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. जानेवारी २०२४ पासून मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर अशा प्रकारच्या नऊ घटना नोंदवण्यात आल्या आहेत.(फोटो सौजन्य – AI)
मुंबईची उपनगरीय रेल्वे दररोज ७५ लाख ते ८० लाख प्रवाशांची वाहतूक करते. गर्दीच्या वेळी गाड्या नेहमीच त्यांच्या निर्धारित क्षमतेपेक्षा खूप जास्त धावतात. ज्यामुळे प्रवासी डब्यांमध्ये खांद्याला खांदा लावून आणि दरवाजांना लटकून बसलेले असतात. वेगवान जीवनशैली, कायद्याबद्दलचा कमी झालेला धाक यामुळे समाज एका निर्णायक टप्प्यावर पोहोचल्याचे’ मत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हमीद दाभोलकर व्यक्त केले आहे. आज प्रत्येकाला घाई आहे. शांतपणे थांबून काम करण्याची क्षमता कमी झाली आहे. जे आहे ते अपुरे वाटते. वाहतूक कोंडी, ताणतणाव, असमाधान आणि अधिक मिळवण्याची हाव यामुळे किरकोळ संभाषणाचेही लगेच वादात रुपांतर होते. समाजात ‘कितीही मिळाले तरी पुरेसे नाही’ ही मानसिकता तयार झाली आहे, असे डॉ. दाभोलकर म्हणाले.
जागतिकीकरणामुळे निम्न मध्यम वर्गातून उच्च-मध्यम वर्गात गेलेल्या लोकांच्या आकांक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे टीका सहन करण्याची क्षमताही कमी झाली आहे. एसी, फस्ट क्लास डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांमध्येही हाणामारीच्या घटना समोर येत असल्याचे चित्र आहे. ही समस्या केवळ सर्वसामान्य वर्गापुरती मर्यादित नाही. फर्स्ट क्लास आणि एसी लोकलसारख्या ‘एलीट’ डब्यांमध्येही अशा घटना वाढल्या आहेत. अलीकडील एका घटनेत पीडित प्रथम श्रेणीचा प्रवासी होता.
लोकलमधील हिंसाचाराच्या घटनांकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहता येणार नाहीचा हा प्रसन जाणाना चाहता आरोग्याचा इशारा आहे, डॉ. दाभोलकर म्हणाले. त्यांच्या मते, सततची धावपळ, आर्थिक ताण, स्पर्धा, गर्दी, प्रवासाचा तणाव आणि संयमाचा अभाव यामुळे लोकांची भावनिक सहनशक्ती कमी होत आहे. त्यामुळे पूर्वी दुर्लक्ष करून पुढे जाता आले असते असे किरकोळ वाद आता काही क्षणांत शिवीगाळ, किंवा जीवघेण्या हिंसाचारात बदलत आहेत. समाजात कायद्याचा धाक कमी होण्याबरोबरच दुसऱ्याच्य मताचा स्वीकार करण्याची आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता घटत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आम्ही प्रवाशांना प्रवासादरम्यान संयम राखण्याचे आवाहन 66 करतो. अशा कोणत्याही घटनेची माहिती मिळाल्यास सहप्रवाशांनी त्वरित रेल्वे प्रशासनाला कळवावे, जेणेकरून वेळेवर मदत आणि कार्यवाही करता येईल, अशी माहिती डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी दिली आहे. मुंबई लोकल ट्रेनमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढत चालल्या आहेत.