Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्राण्याला वाचवायला गेले अन् गाडीवरील नियंत्रण सुटले! वर्ध्यात पोलीस कर्मचाऱ्यासह कुटुंबाचा दुर्दैवी अंत

वर्ध्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 08, 2025 | 11:56 AM
Wardha police officer accident case Tragic end for the entire family

Wardha police officer accident case Tragic end for the entire family

Follow Us
Close
Follow Us:

वर्धा : राज्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वर्ध्यामध्ये देखील भीषण अपघात झाला आहे. यामध्ये पोलीस अधिकाऱ्याचे पूर्ण कुटुंब उद्धवस्त झाले आहे. वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव या ठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये वाहन चालवताना प्राणी मध्ये आल्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला.

आपल्या कुटुंबासह वर्ध्याकडे कारने येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे. यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची मोठी घटना घडली आहे. तर प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांची अपत्य ही केवळ तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचाही मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. काल (7 एप्रिल) मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्राच्या पोलिसांवर ताण

कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच राज्यातील जनतेच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी ज्या पोलीस दलावर आहे, त्यांच्यावरील कामाचा ताण सातत्याने वाढत आहे. राज्याची एकूण लोकसंख्या आणि उपलब्ध एकूण पोलिस दल यांचा विचार करता तब्बल एक लाख लोकसंख्येच्या रक्षणासाठी केवळ 172 पोलिस उपलब्ध आहेत, ही बाबच पोलिसांवरील वाढता ताण दर्शवणारी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी ८३ लाख इतकी आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी राज्यात माहिती अधिकाराखाली प्राप्त माहितीनुसार, २०२४ च्या आकडेवारीचा विचार केला असता राज्यात प्रत्यक्ष पोलिस संख्याबळ १ लाख ९८ हजार ८७० इतके आहे. म्हणजेच एक लाख लोकसंख्येमागे १७२ पोलीस आहेत. तर महिला पोलिसांची संख्या ३६ हजार ९ इतकी असून, एकूण उपलब्ध पोलिस संख्याबळाच्या तुलनेत महिला पोलिसांचे प्रमाण १८.११ टक्के इतकेच राहिले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मुंबईसाठी ५१ हजार पोलिस तैनात

मुंबई महानगरीतील जनतेच्या रक्षणाचे काम ५१ हजार ३०९ अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत. मुंबईत एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांचे प्रमाण केवळ २७० इतकी आहे. देशाचा विचार करता देशाची एकूण लोकसंख्या आणि तैनात पोलिस दल विचारात घेता देशात एक लाख लोकसंख्येमागे केवळ १५३ पोलीस आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या निकषानुसार हे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे किमान २२२ इतके असणे आवश्यक आहे.

Web Title: Wardha police officer accident case tragic end for the entire family

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 11:55 AM

Topics:  

  • Accident Case
  • maharashtra news
  • wardha

संबंधित बातम्या

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?
1

Anjangav Rada : शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद चिघळला; अंजनगावात परिस्थिती हाताबाहेर?

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा
2

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

Ratnagiri News :  आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त
3

Ratnagiri News : आकलेत खासगी कंपनीचे अतिक्रमण? शेतकरी संतप्त

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड
4

Satara News : वाॅटर स्पोर्ट्साठी पर्यटकांची गर्दी; मुनावळ्यातील निळ्याशार पाण्यात बोटींची राईड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.