Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water News: तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारे ‘हे’ धरण उद्या मायनसमध्ये जाणार? चिंता वाढली

पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं धरण उद्या पर्यंत मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार धरण केवळ साडेतीन टक्के प्लस आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 16, 2025 | 09:51 PM
Water News: तीन जिल्ह्यांसाठी वरदायिनी असणारे ‘हे’ धरण उद्या मायनसमध्ये जाणार? चिंता वाढली
Follow Us
Close
Follow Us:

इंदापूर:  पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेलं उजनी धरण उद्या पर्यंत मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे. बुधवारच्या आकडेवारीनुसार उजनी धरण हे केवळ  साडेतीन टक्के प्लस आहे. म्हणजे उजनीमध्ये केवळ दोन टीएमसी इतकाच जिवंत पाणीसाठा राहिला आहे.त्यामुळे उजनी वर अवलंबून असणाऱ्या सर्वांचीच चिंता वाढणार आहे.

सध्या उजनी धरणामधून भीमा नदीपात्रामध्ये सहा हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. पुण्यासह अहिल्यानगर, सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून उजनी धरणाची ओळख आहे. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने म्हणजे ११० टक्के भरले होते.

धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून यापैकी ६३ टीएमसी पाणीसाठा मृतसाठा असतो. तर ५४ टीएमसी पाणी उपयुक्त साठ्यात असते. सध्या उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या ६५ पूर्णांक ५७ टीएमसी इतकाच पाणीसाठा आहे.

यंदा धरण ११० टक्के भरलेले असताना देखील ते एप्रिल महिन्याच्या मध्यातच मायनस मध्ये जाण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे धरणातील पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. तसेच शिल्लक पाणी मे, जून महिन्यांपर्यंत टिकवून ठेवण्याचे आव्हान संबंधित विभागापुढे आहे.

पुण्यात पाण्याची मागणी वाढली

वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रासले आहेत. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवक तसेच राजकीय नेते थेट तक्रारी घेत तसेच स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा विभागावर मोर्चा घेवून जात आहेत. त्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जात असून वाढीव २ एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरु केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले

कमी दाबाने पाणी येत आहे, उशिरा पाणी येत आहे, जलवाहिनी फुटली आहे, वॉलमन पाणी कमी दाबाने सोडतो, अशा प्रकारांच्या तक्रारी देणारे फोन दररोज महापालिकेत येत आहेत. तक्रार देवूनही तसेच पाठपुरावा करुन देखिल पाणी येत नसल्याने थेट पाणीपुरवठा विभागात येवून प्रमुखांना घेराव घातला जात आहे.

एरंडवणे, कर्वेनगर, डीपी रस्ता पटवर्धन बाग, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा, भांडारकर रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, शिवाजीनगर, धायरी, धायरी फाटा, गुरुवार पेठ, रविवार पेठ आदी पेठांचा भाग, तसेच उपनगर भागासह सामाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी  करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत.

Web Title: Water level decrease and minus ujani dam important for pune solapur and ahilyanagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2025 | 09:51 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Pune
  • Solapur Crime
  • water news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ
1

Maharashtra Politics: अहिल्यानगरमधील मनसेच्या उमेदवारांचा गेम? अचानक गायब झाल्याने उडाली खळबळ

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी
2

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी

Ahilyanagar News: ‘या’ गावातील ‘अंडे का फंडा’ चांगलाच चर्चेत! रोज होतेय तब्बल 45 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल
3

Ahilyanagar News: ‘या’ गावातील ‘अंडे का फंडा’ चांगलाच चर्चेत! रोज होतेय तब्बल 45 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला
4

Solapur Crime: अनैतिक संबंधाच्या संशयातून सोलापूर जिल्ह्यात तरुणाचा निर्घृण खून; आठवडा बाजारातच कोयत्याने हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.