• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Water Demand Increase In Pune City Because Of Summer Season Khadakwasla Dam Marathi News

Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले

एकीकडे पाणी टंचाई निर्माण होत असताना दुसरीकेडे उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तेथे जास्त पाणी वापरले जात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2025 | 02:35 AM
Pune Water News: उन्हाळा वाढला! पुण्यात पाण्याची मागणी वाढली; मात्र ‘या’ कारणामुळे नागरिक त्रासले

पुण्यात पाण्याची मागणी वाढली (फोटो- सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पुणे: वाढत्या उन्हामुळे शहरात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक त्रासले आहेत. अनेक भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने माजी नगरसेवक तसेच राजकीय नेते थेट तक्रारी घेत तसेच स्थानिक नागरिकांसह पाणीपुरवठा विभागावर मोर्चा घेवून जात आहेत. त्यावर पाणीपुरवठा सुरळीत केला जात असून वाढीव २ एमएलडी पाण्याचा पुरवठा सुरु केला जात आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

कमी दाबाने पाणी येत आहे, उशिरा पाणी येत आहे, जलवाहिनी फुटली आहे, वॉलमन पाणी कमी दाबाने सोडतो, अशा प्रकारांच्या तक्रारी देणारे फोन दररोज महापालिकेत येत आहेत. तक्रार देवूनही तसेच पाठपुरावा करुन देखिल पाणी येत नसल्याने थेट पाणीपुरवठा विभागात येवून प्रमुखांना घेराव घातला जात आहे.

एरंडवणे, कर्वेनगर, डीपी रस्ता पटवर्धन बाग, विधी महाविद्यालय रस्ता, पौड फाटा, भांडारकर रस्ता, जनवाडी, गोखलेनगर, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, शिवाजीनगर, धायरी, धायरी फाटा, गुरुवार पेठ, रविवार पेठ आदी पेठांचा भाग, तसेच उपनगर भागासह सामाविष्ट गावांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. महापालिकेकडे वारंवार तक्रारी  करुनही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिक त्रासले आहेत.

शिवाजी नगर, बिबवेवाडी, वडगाव शेरी, खराडी आदी भागात पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. तर एरंडवणे, पटवर्धन बाग, नळ स्टॉल आदी भागात पूर्ण दाबाने पाणी  पाणी पुरवठा होत आहे, तसेच वेळेआधीच अर्धा ते पाऊण तास पाणी जात आहे. सोसायट्यांच्या टाक्या भरत नसल्याने तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी पुरवठा विभागाकडून आम्ही पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करत आहोत असे सांगितले जात असले तरीही प्रत्यक्षात नागरिकांना कमी पाणी मिळत आहे. याप्रमाणे सेनापती बापट रस्ता, वडारवाडी, जनवाडी, मॉलेड कॉलनी या परिसरातील आहे. पाण्याचा दाब नसल्याने बारीक धारेने पाणी येत आहे. पूर्ण वेळ पाणी असले तरीही टाक्या भरत नाहीत. धायरी, धायरी फाटा परिसरातही कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे येथील सोसायट्यांना टँकर मागवावे लागत असल्याने दररोज हजारो रुपये टँकरवर खर्च करावे लागत आहेत.

एकीकडे पाणी टंचाई निर्माण होत असताना दुसरीकेडे उन्हाळ्याचे चटके बसण्यास सुरुवात झाल्यानंतर पाण्याची मागणी वाढली आहे. ज्या भागात पाणी पुरवठा होतो, तेथे जास्त पाणी वापरले जात आहे. त्यानंतर टाकी भरण्यास वेळ लागत आहे. पण पाणी दुसऱ्या भागाला पाणी सोडणे आवश्‍यक असल्याने टाकीत पूर्ण दाबाची पातळी येण्याआधीच पाणी पुरवठा सुरु करावा लागत आहे. त्यामुळे जलवाहिनीच्या सुरुवातीच्या भागात जास्त पाणी उपलब्ध होत आहे. जलवाहिनीचा शेवटचा भाग, उंचावरील भागात पाणी पोचण्यास उशीर होत आहे आणि त्या भागाला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था असेल तर जून महिन्यापर्यंत आणखी भीषण स्थितीला सामोरे जावे लागण्याची स्थिती आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाला योग्य नियोजन करून पाणी पुरवठा सुरु ठेवावा लागणार आहे.

Pune News: शहरातील ५२ टाक्यांची स्वच्छता; मात्र GBS क्षेत्रातील 20 पेक्षा अधिक टाक्या…

जलवाहिन्यांचे नकाशे नाहीत उपलब्ध

 शहराच्या कानाकोफऱ्यात पाणीपुरवठा विभागाने जलवाहिन्यांचे जाळे निर्माण केले आहे. अनेक जलवाहिन्यांद्वारे पाणी येण्यास अडथळा येत आहे. तसेच जलवाहिन्याअसून देखिल पाणी येत नाही. जलवाहिन्यांचे कनेक्शन तसेच वॉल दुरुस्ती केली जाते. परंतु शहरातील जलवाहिन्यांचे नकाशेच पाणीपुरवठा विभागाकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळे पाण्याची समस्या सोडविण्यास वेळ लागत असल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढत असते. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास कसरत करावी लागते. त्यामुळे काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, कमी वेळ पाणी येणे अशा अडचणी येत आहेत. नेहमीपेक्षा २ एमएलडी पाण्याची मागणी वाढली आहे. त्याप्रमाणे वाढीव पाणी दिले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी दिले जाईल. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदा धरणसाठ्यात पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार आहे.

 – नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका.

Web Title: Water demand increase in pune city because of summer season khadakwasla dam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
2

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?
3

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष
4

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.