Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात दुष्काळग्रस्तांना मदत कधी देणार?; आमदार धंगेकर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

'दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार', असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 08, 2024 | 05:00 PM
राज्यात दुष्काळग्रस्तांना मदत कधी देणार?; आमदार धंगेकर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : जवळजवळ निम्मा महाराष्ट्र सध्या दुष्काळाने होरपळत आहे. पाण्याची कमतरता जाणवते आहे. त्यामुळे शेतकरी अस्वस्थ झाला आहे. मात्र सरकारने अद्याप त्यांना दुष्काळग्रस्तांसाठीची मदत, सुविधा दिल्या नाहीत. याकडे सरकारचे लक्ष वेधत ‘दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत कधी देणार’, असा सवाल काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केला आहे.

‘सध्याच्या सरकारला सर्वसामान्य लोकांकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडला आहे, अशी खंत धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. सरकारने ४० तालुक्यांत आणि सुमारे १ हजार २०० महसूल मंडलात दुष्काळ जाहीर केला आहे. पण, कुठलीही उपाययोजना या भागात अद्याप केली नाही. दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदतही दिली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळग्रस्तांना मदत देण्याची कार्यवाही तत्काळ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धंगेकर म्हणाले, ‘यंदा वरुणराजाने पाठ फिरवल्याने राज्याच्या अनेक भागांत दुष्काळाची स्थिती आहे. पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ जनतेवर आली आहे. देशाची भूक भागविणारा, काळ्या आईशी इमान राखणारा शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे दुष्काळाशी सामना करणारी जनता प्रचंड अस्वस्थ आणि सरकारवर कमालीची नाराज असल्याचे पहायला मिळत आहे.’

‘शेतकऱ्यांवर सातत्याने एकामागून एक संकटे कोसळत आहेत. कधी पावसात खंड तर कधी गारपीट यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांचा पैसा आणि श्रम दोन्ही डोळ्यादेखत वाहून गेले. पाण्याअभावी रब्बी पिकेसुद्धा संकटात सापडली आहेत. तर दुसरीकडे, अनेक संकटापासून वाचविलेल्या धान्याला बाजारात मातीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे नेमके जगावे कसे, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला. मात्र, जिथे सत्ताधारी पक्षाचा प्रभाव आहे, तेच तालुके सरकारने निवडले, अशी टीका झाल्यानंतर १ हजार २०० महसूल मंडल हे दुष्काळग्रस्त म्हणून सरकारने जाहीर केले. या घोषणेला बरेच दिवस झाले. पण, अद्याप एक नवा पैसा दुष्काळग्रस्तांना मिळाला नाही. दुष्काळाच्या सुविधाही मिळाल्या नाहीत, अशी सध्याची स्थिती आहे. दुष्काळग्रस्त भागातील जनतेसाठी पॅकेज जाहीर करून त्यांना आर्थिक मदत द्यावी. शासकीय सुविधा तातडीने द्याव्यात. पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा. जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.

Web Title: When will help be given to drought victims in the state mla dhangekars question to the chief minister nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2024 | 05:00 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • maharashtra
  • MLA ravindra dhangekar
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर
1

Sanjay Nirupam: “पंतप्रधानांनी काय आता पायी चालावे का?”; इंधन बचतीच्या आवाहनावरून विरोधकांना संजय निरुपम यांचे सडेतोड उत्तर

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
2

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी
3

Pratap Sarnaik : ओला, उबर, रॅपिडो अडचणीत? महाराष्ट्र सरकारने सायबर विभागाकडे केली FIR ची मागणी

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच
4

Chandrapur News: मुसळधार पावसानंतरही चंद्रपूरमध्ये भीषण पाणीटंचाई; नागरिकांची पाण्यासाठी पायपीट सुरुच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.