Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

West Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी; कोणाची ताकद जास्त, कोण कमजोर?

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पडल्यानंतर  महाविकास आघाडीने मोीठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 19, 2024 | 10:38 AM
West Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रात कोण मारणार बाजी; कोणाची ताकद जास्त, कोण कमजोर?
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चार कृषी जिल्ह्य़ांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांच्यात चुरशीची लढत होत असते. गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये या जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या ३७ विधानसभा जागांवर अविभाजित राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. त्याचवेळी भाजप, काँग्रेस आणि अविभाजित शिवसेनेलाही जवळपास समसमान जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांपैकी कोणाला सत्तेची खुर्ची देणार, हे निकालाच्या दिवशीच ठरणार आहे.

या चार जिल्ह्यांत मुख्यमंत्रीपदाचे दोन दावेदार आहेत. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशिवाय अनेक दिग्गज येथून नशीब आजमावत आहेत. अर्धा डझनहून अधिक जागांवर विभागलेले राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादीला अनुक्रमे 13 आणि 11 जागा मिळाल्या होत्या, तर भाजपला 8-8  जागा मिळाल्या होत्या. 2014 मध्ये काँग्रेसला 6 आणि 2019 मध्ये 8 जागा मिळाल्या, तर अविभाजित शिवसेनेला 9 आणि 5 जागा मिळाल्या.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या; उद्या मतदान, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

निवडणूक मुद्द्यांपासून भरकटली

गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पडल्यानंतर  महाविकास आघाडीने मोठी झेप घेतली. लोकसभा निवडणुकीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले.  त्यातून सावरण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. निवडणूक मुख्य मुद्द्यांपासून भरकटली आहे. ही निवडणूक पूर्णपणे लोकप्रिय घोषणा, वैयक्तिक हल्ले, नव्याने मांडलेल्या घोषणा आणि दोन्ही पक्षांच्या उमेदवारांचे चेहरे यावर केंद्रित झाली आहे. अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांसह दोन्ही आघाडीतील सहा पक्षांमुळे निवडणूक अधिक गुंतागुंतीची झाली आहे. सोलापूर, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या अनेक जागांवर सूडाची भावना प्रबळ झाल्याचे दिसत आहे.  त्याततच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगलीत मोठ्या विजयाची रणनीती ठरवली आहे.  या चार जिल्ह्यांच्या निवडणुकीतील लढाईत शेतकरी आणि महिला मतदार निर्णायक भूमिका असणार आहे.

‘वास्तविकता’ सिद्ध करण्याची धडपड : राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही गटांना गमावण्यासाठी आणि कमावण्यासाठीही खूप काही आहे. कुणाची शिवसेना आणि राष्ट्रवादी खरी आणि कुणाची खोटी  हाही जनतेचा निर्णय असणार आहे. लोकांशी संवाद साधताना बहुतेकांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती वाटते. पण, साताऱ्यात शरद पवार यांच्यासमोर अधिक आव्हाने आहेत. एकेकाळी साताऱ्याच्या जवळपास सर्वच जागा जिंकून स्वबळावर विजय-पराजयाची पटकथा लिहिणारे शरद पवार राष्ट्रवादीतील फुटीनंतर  यावेळी चुरशीची लढत होणार आहे. काँग्रेस आणि भाजपला या भागावर आपली पकड कायम ठेवायची आहे. लोकसभा निवडणुकीतील यशाची पुनरावृत्ती भाजपला कितपत वाढवता येते किंवा काँग्रेस कितपत सक्षम होते, याकडेही लक्ष लागले आहे.

४४ वर्षांच्या फिल्मी करियरला राकेश रोशन यांनी ठोकला कायमचा रामराम

महाविकास आघाडीचे भक्कम मुद्दे

-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला. या दोन्ही पक्षांनी येथे 50 टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या आहेत                -लोकसभा निवडणुकीतील यशाने भाजपला रोखण्याचा आत्मविश्वास वाढला.
-रोजगार आणि पिकांना चांगला भाव न मिळाल्याने सत्ताधारी महायुतीबद्दल नाराजीची भावना.

कमकुवत बाजू

-अनेक विधानसभा मतदारसंघात जागावाटपाच्या वादातून बंडखोरी होऊन अनेक उमेदवार आपल्याच पक्षाविरुद्ध लढत आहेत.
– तिन्ही पक्षांमध्ये परस्पर समन्वयाचा अभाव
-काही विधानसभा मतदारसंघात कमकुवत उमेदवार

महायुतीच्या भक्कम बाजू-

-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महिलांवर परिणाम                                                                                                        -काही ठिकाणी रस्ते इत्यादी पायाभूत सुविधांच्या विकासामुळे लोक प्रभावित
-लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि संघाचे कार्यकर्ते सर्व शक्ती पणाला लावली आहे.

कमकुवत बाजू-

-बेरोजगारीच्या मुद्द्यावरून महायुतीबद्दल नाराजीची भावना                                                                                                -काही भागात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची भावना
-एक म्हणजे सुरक्षिततेचा नारा देऊन उलट ध्रुवीकरण.

Web Title: Who is more powerful in west maharashtra mahayuti or mahavikas aghadi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2024 | 09:49 AM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra election 2024
  • sangali

संबंधित बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
1

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! आधी डोळ्यात चटणी टाकली, नंतर कोयत्याने गळ्यावर सपासप वार; पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन
2

“मराठ्यांचे भवन दिल्लीत व्हावे…; अखिल भारतीय मराठा महासंघाचा राज्यस्तरीय मेळाव्यात खासदार छत्रपती शाहू महाराजांचे प्रतिपादन

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश
3

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतणार; ‘या’ तारखेपर्यंत संयुक्त आराखडा सादर करण्याचे आदेश

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास
4

कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर परिसरात भिकाऱ्यांची दादागिरी; भाविकांना सहन करावा लागतोय त्रास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.