Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकमंत्रिपदाचा तिढा काय सुटेना अन् जिल्ह्यातील विकासकामे काय होईना; आतापर्यंत…

दोन उपमुख्यमंत्री, 38 मंत्री आहेत. यापैकी 38 मंत्र्यांमधून वाशिम जिल्ह्याला एक पालकमंत्री मिळत नाही, हे वाशिमचे दुर्दैव की मुद्दाम पालकमंत्री न देण्याचे राजकारण होत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 12, 2025 | 01:33 PM
'लाडकी बहीण'नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना...

'लाडकी बहीण'नंतर राज्यातील महिलांसाठी सरकारने घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय; आता महिलांना...

Follow Us
Close
Follow Us:

वाशिम : वाशिम जिल्ह्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळेच आजही जिल्ह्यच्या पालकंमत्रिपदाचा तिढा सुटला नाही. त्यामुळे विकासकामे खोळंबत आहेत. आतातरी जिल्ह्याला पालकमंत्री मिळेल काय? असा सवाल नागरिकांकडून केल्या जात आहे. मात्र, पालकमंत्री निवडण्यासाठी सध्या राजकारण केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.

हेदेखील वाचा : भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून पडल्या बाहेर; ‘या’ कारणासाठी घेतला निर्णय

जिल्ह्याचा पालकमंत्री कोणीही होवो त्यांनी वाशिम जिल्ह्याचे आकांक्षित असलेला डाग पुसण्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार कसा उपलब्ध होईल, यासाठी जिल्ह्यात औद्यागिकरण, शैक्षणिक, सिंचन, नागरिकांना आवश्यक असणाऱ्या योजना या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्याची गरज आहे. मात्र, आतापर्यंत ‘झेंडा टू झेंडा’च पालकमंत्री मिळत असल्यामुळेच जिल्ह्याचा विकास खुंटला आहे.

नागरिकांमध्ये शंकाकुशंका

दोन उपमुख्यमंत्री, 38 मंत्री आहेत. यापैकी 38 मंत्र्यांमधून वाशिम जिल्ह्याला एक पालकमंत्री मिळत नाही, हे वाशिमचे दुर्दैव की मुद्दाम पालकमंत्री न देण्याचे राजकारण होत आहे. आपल्याच पक्षाला पालकमंत्रिपद मिळावे, यासाठी एकमेकावर दबावतंत्राचा वापर तर होत नाहीना, असा सवाल नगारिकांकडून होत आहे.

जिल्ह्यातील एमआयडीस परिसरात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत नाही. अनेकांना जिल्ह्याबाहेर नोकरी, कामाच्या शोधात जावे लागत आहे. त्यामुळे या योग्य विकासासह बेरोजगारांना नोकऱ्या कशा उपलब्ध होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी पालकत्व जिल्ह्याला आवश्यक आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवावा जेणेकरून जिल्ह्याचा विकास योग्य होईल, अशी जिल्हावासियांकडून मागणी होत आहे. मात्र, सध्या राजकारणामुळेच पालकमंत्रिपदाचा तिढा सुटता सुटेना, अशी जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकराज

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यामुळे नागरिकांची कामे होत नाहीत. यामध्ये वाशिम न. प., कारंजा न. प., मालेगाव न. प.. मंगरुळपीर न. प. या चारही नगर परिषदेवर प्रशासक राज असल्यामुळे विकासकामे खोळंबली आहे. तर मानोरा नगर पंचायत, व रिसोड नगर परिषद सध्या एक ते दीड वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे. तर आता बुधवारपासून (दि. 15) ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपणार असल्यामुळे ग्रामीण भागातही विकासकामे खोळंबतील. त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री असणे आवश्यक झाले आहेत.

सरकारी योजनांची दिली जात नाही माहिती

कृषी विभागाच्या योजना सर्वसामान्य, गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाहीत, योजनांची माहिती सुद्धा दिली जात नाही. वशीलेबाजीने योजनांचा लाभ जातो. या सर्व बाबीकडे कुणाचेही लक्ष नसल्यामुळे पालकमंत्री जिल्ह्याला आवश्यक झाले आहेत, असे मानोरा येथील शेतकरी नाना शिंदे यांनी सांगितले.

शिंदेंच्या शिवसेनेकडून पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरु

भाजपचे मित्रपक्ष शिंदेसेना गटाकडून पालकमंत्रिपदासाठी ओढताण सुरू आहे. त्यात माजी पालकमंत्री संजय राठोड यांना पालकमंत्री करू नये, अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे संजय राठोड पालकमंत्री असावे. मात्र, राज्य सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Who will guardian minister of washim discussion started nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 01:33 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई
1

Washim News : किरकोळ वादातून काढला भावाचा काटा! तपासातून सत्य उघड; पिंपळगावराजा पोलिसांची धडक कारवाई

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता
2

जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त कधी? ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाकडे लक्ष; इच्छुकांमध्ये अस्वस्थता

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया
3

कारंजा न.प.चा १३० कोटींचा अर्थसंकल्प सादर! सर्वच घटकांच्या विकासाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.