Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Assembly Election: 2004 मध्ये अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? शरद पवारांनी स्पष्टचं सांगितलं

ही 2004 ची गोष्ट आहे. देशात मोठा राजकीय बदल झाला. राष्ट्रीय स्तरावर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेबाहेर पडले. त्याच वेळी महाराष्ट्रात निवडणुका झाल्या.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 12, 2024 | 01:15 PM
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती, म्हणाले, 'एका कार्यक्रमात त्यांना...

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अजित पवारांची महत्त्वाची माहिती, म्हणाले, 'एका कार्यक्रमात त्यांना...

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता काही दिवस उरले आहेत. निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत एका मोठ्या रहस्याचा उलगडा झाला आहे.  अजित पवार हे अनेकवेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. मलाही मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. मागील 30 वर्षांहून अधिक काळापासून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वी ते शरद पवार यांचे नैसर्गिक उत्तराधिकारी मानले जात होते. पण, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही, असेही नाही. पण यामागेही अनेक गोष्टी दडलेल्या आहेत.

ही 2004 ची गोष्ट आहे. देशात मोठा राजकीय बदल झाला. राष्ट्रीय स्तरावर अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेबाहेर पडले. त्याच वेळी महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. काही वर्षांपूर्वी सोनिया गांधींच्या परदेशी वंशामुळे काँग्रेसपासून फारकत घेऊन स्वत:चा पक्ष स्थापन करणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करून निवडणूक लढवली. निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. राष्ट्रवादीने 124 जागांवर निवडणूक लढवली आणि 71 जागांवर विजय मिळवला. तर 157 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या काँग्रेसने 69 जागा जिंकल्या. शिवसेना 62 आमदारांसह तिसऱ्या क्रमांकावर तर भाजप 54 आमदारांसह चौथ्या क्रमांकावर  होता. यापूर्वी 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच रिंगणात उतरून 58 जागा मिळवल्या होत्या.

हेही वाचा : Maharashtra Election 2024: सलग 11 वेळा विजयाचा रेकॉर्ड; पण यावेळी ‘या’ नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार

सर्वात मोठ्या पक्षाला मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळाली नाही

राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याने काँग्रेससोबत आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाची मागणी करण्याची संधी राष्ट्रवादीला होती. त्यावेळी अजित पवार हे राज्यातील तरुण उदयोन्मुख नेते होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांची सावली म्हणून ते राहिले. पण, शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाचा आग्रह धरला नाही आणि आघाडी सरकारमध्ये कमी जागा असूनही काँग्रेसचे विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली. मात्र, त्याबदल्यात शरद पवार यांच्या पक्षाला अधिक मंत्रिपदे देण्यात आली.

शरद पवारांनी आता मुख्यमंत्रिपदाची मागणी न करण्याबाबतचे रहस्य उघड केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. त्यावेळी पक्षाला जास्त मंत्रीपदे मिळाली. पक्षातील तरुण नेत्यांनी राज्यात पुढे यायला हवे, हा त्यावेळचा आपला विचार होता. अशा परिस्थितीत आर.आर.पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे नेते उदयास आले. पुढे अजित पवार मोठे नेता झाले. अशावेळी पक्षाला नव्या नेतृत्वाला बळ देण्याची गरज होती.

हेही वाचा : Maharashtra Elections 2024: महाराष्ट्र निवडणुकीत पैसे वाटले जात आहेत का? संजय राऊतांचा महायुतीवर गंभीर आरोप

एक विचारधारा

काँग्रेसने विलासराव देशमुख यांना पुन्हा मुख्यमंत्री केले. यावर शरद पवार म्हणाले की, विलासराव देशमुख यांचा पक्ष वेगळा असला तरी आम्ही सर्वजण गांधी-नेहरूंच्या विचारसरणीचे अनुयायी आहोत. त्यामुळे विलासरावांनी मुख्यमंत्री होणे अधिक योग्य होते. ओबीसींना सत्तेत स्थान मिळाले, असेही पवार म्हणाले. त्यामुळे छगन भुजबळांनाही ताकद मिळाली. मात्र, अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपासून दूर राहणे कधीच आवडले नाही. शरद पवारांच्या या निर्णयावर ते शांततेत कायम प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहिले.

 

Web Title: Why ajit pawar was not given the post of chief minister in 2004 sharad pawar made it clear nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2024 | 01:15 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
1

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल
2

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
3

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.