जान्हवी किल्लेकरसाठी पतीची खास पोस्ट
सध्या ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनची जोरदार चर्चा सुरु आहे. यंदाच्या सीझनमध्ये प्रसिद्ध सेलिब्रिटींसोबतच टेलिव्हिजन सेलिब्रिटी आणि सोशल मीडिया एन्फ्लूएंसरही स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत. अशामध्येच सध्या प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री जान्हवी किल्लेकर तिच्या खेळामुळे चर्चेत आली आहे.
सध्या जान्हवी बिग बॉसच्या घरात जोरदार राडा घालताना दिसत आहे. रुपेरी पडद्यावर खलनायकाच्या भूमिकेत दिसणारी जान्हवी सध्या बिग बॉसच्या घरात व्हिलन ठरली आहे. बिग बॉसच्या घरात वयानं मोठ्या असणाऱ्या वर्षा उसगांवकर यांचा आणि अभिनेता पंढरीनाथ कांबळेचा तिने अपमान केला. तिच्या ह्या वागणुकीमुळे तिला फक्त नेटकरीच नाही तर मराठी फिल्म इंडस्ट्रीतले अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटीही तिला ट्रोल करीत आहे. अशातच जान्हवीच्या पतीने खास तिच्यासाठी इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे.
हे देखील वाचा – शाहरूख खानने मागितलेली प्रसिद्ध दिग्दर्शकांची माफी, नेमकं कारण काय ?
काय म्हणाला जान्हवीचा नवरा
जान्हवीचा नवरा झाला व्यक्त
बिग बॉस मराठीच्या घरात सध्या सुरू असलेल्या वादग्रस्त घटनांवर, जान्हवी किल्लेकरच्या पतीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. इन्स्टा स्टोरीमध्ये जान्हवी किल्लेकरचा पती किरण किल्लेकरने लिहिले की, “जान्हवीने जे शब्द वापरले ते चुकीचे होते. एखाद्याच्या करियरबद्दल बोलण योग्य नाही. पण जेव्हा हे घडलं तेव्हाचे क्षण तसे असल्यामुळे ती रागाच्या प्रवाहात बोलून गेली. याचा अर्थ असा नाही की, ती बरोबर आहे किंवा ती नक्कीच चुकली आहे. बिग बॉसचं घर साधं घर नाही.”
“घरात असलेली लोकं पॉझिटिव्ह असतील असं पण नाही आणि प्रत्येक जण निगेटिव्ह आहेत असं ही नाही. तिथे गेल्यानंतर लोकं बदलतात त्यांच्या वागण्याची पद्धत बदलते. याच्याशी त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काहीही घेणं देणं नाही. लोकांनी उगंच अर्थाचा अनर्थ करू नये. जान्हवी रागात बोलते म्हणून ती चुकीची बाकीचे सदस्य बोलतात ते सगळ बरोबर. जेव्हा धनंजय वर्षाताईंबद्दल बोलतो, मी ह्या बाईचा १ दिवस पाण उतारा करीन. अंकिता बोलते, हिच्या मध्येच खूप खोडी आहेत. अशी सासू मला नको. तेव्हा पंढरीनाथ बोलतात कॅमेरा आपल्याकडे आहे. नका बोलू तेव्हा कुठे गेलेले आदर्श तेव्हा वर्षाताई सिनियर नव्हत्या म्हणजे ?”
हे देखील वाचा – शेखर कपूर ठरले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक मागणी असलेले दिग्दर्शक
“जर जान्हवी बोलली तेव्हा आदर्श चुकीचे शब्द लोकांना दिसले पण तिने नंतर वर्षा ताईंची माफी मागून त्यांची ते सेवा करते ते फक्त फुटेजसाठी असतात, अस लोकांचा मत आहे. जरा नीट बघा २४ तासाच्या प्रवासात काय काय घडत आपल्याला याची माहिती नसते. ती १ तासात आपल्या पर्यंत पुरवली जाते त्यातून कोण वाईट आणि कोण चांगले हे लोकांनी ठरवू नका. बिग बॉसचा खेळ चालू असताना कोण काय करतं? कसं उत्तर देतं? आणि का देतं? याचा पण विचार करा…”
“बोलायला खूप आहे, पण जास्त बोलणं मला योग्य वाटत नाही. कारण लोक माझ्या या विषयाला आता आगीसारखं पसरवतील आणि काही तरी चुका काढतील त्या सगळ्यांना मी शुभेछा देतो आणि जे आम्हाला समजतील त्यांना मी धन्यवाद देतो. मी जान्हवीसाठी एवढंच म्हणेल तू थोडंसं रागावर कंट्रोल कर आणि हळू हळू पुढे जा आम्ही आहोत तुझ्या सपोर्टसाठी.”