(फोटो सौजन्य - Instagram)
आतापर्यंत बॉलिवूडच्या कॉमेडी फ्रँचायझी चित्रपट ‘हेरा फेरी’चे दोन भाग प्रदर्शित झाले आहेत. चाहते तिसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच बाबू भैया परेश रावल यांनी चित्रपटातून माघार घेतल्यामुळे चाहत्यांचे मन दुखावले आहे. दरम्यान, अक्षय कुमारने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. ‘हेरा फेरी ३’ चे नुकसान केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याच्याकडून २५ कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.
निर्मिती संघाने खटला दाखल केला
हिंदुस्तान टाईम्सच्या एका विशेष वृत्तानुसार, अक्षय कुमारच्या प्रॉडक्शन हाऊस केप ऑफ गुड फिल्म्सने परेश रावल यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. कायदेशीर करारावर स्वाक्षरी न करणे, अत्यंत गैरव्यावसायिक वर्तन करणे आणि हेरा फेरी ३ चे चित्रीकरण सुरू झाल्यानंतर अचानकपणे अर्ध्यावर सोडणे यासाठी २५ कोटी रुपयांची भरपाई अभिनेत्याकडून मागितली आहे.
अभिनेत्याला मिळत होती तिप्पट फीस
‘हेरा फेरी ३’ साठी करार केल्यानंतर आणि शूटिंग सुरू केल्यानंतर परेश रावल यांनी अचानक अव्यावसायिक पद्धतीने चित्रपट सोडल्याचा दावा प्रोडक्शन हाऊसने केला आहे. ‘हेरा फेरी ३’ साठी परेश रावल यांना तिप्पट जास्त पैसे दिले जात असल्याचे अहवालात म्हटले आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, ‘परेश रावल यांनी नैतिकता आणि व्यावसायिक वर्तनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. जर त्यांना चित्रपट करायचा नव्हता तर त्यांनी करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी, ॲडव्हान्स शुल्क घेण्यापूर्वी आणि निर्मात्यांना शूटिंगवर मोठा पैसा खर्च करायला लावण्यापूर्वी तसे सांगायला हवे होते.’ असे त्यांनी अहवालात म्हटले आहे.
I wish to put it on record that my decision to step away from Hera Pheri 3 was not due to creative differences. I REITERATE THAT THERE ARE NO CREATIVE DISAGREEMENT WITH THE FILM MAKER . I hold immense love, respect, and faith in Mr. Priyadarshan the film director. — Paresh Rawal (@SirPareshRawal) May 18, 2025
नॅन्सी त्यागीने कान्समधील लुक केला कॉपी? नेहा भसीनने फॅशन इन्फ्लुएंसरवर केले आरोप, दाखवले पुरावे
परेश रावल यांनी चित्रपट नाकारला
परेश रावल यांनी अलिकडेच कल्ट कॉमेडी चित्रपट हेरा फेरी सोडल्याची पुष्टी केली होती. सुरुवातीला कारण स्पष्ट नव्हते पण मिड डे शी बोलताना त्यांनी खुलासा केला की त्यांना चित्रपटाचा भाग असल्यासारखे वाटत नव्हते. सर्जनशील मतभेदांमुळे परेश रावल यांनी ‘हेरा फेरी ३’ पासून स्वतःला दूर केले आहे अशी चर्चाही सुरू झाली. तथापि, परेश रावल यांनी एक्सवर स्पष्टीकरण दिले होते की त्यांनी सर्जनशील मतभेद किंवा पैशांमुळे चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला नव्हता. तसेच त्यांनी चित्रपट दिग्दर्शक श्री. प्रियदर्शन यांच्याबद्दल मला अपार प्रेम, आदर आणि विश्वास आहे.’ असे अभिनेत्याने या पोस्टमध्ये स्पष्ट सांगितले आहे.