
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
Paresh Rawal On Akshay Kumar: बॉलिवूड अभिनेते परेश रावल सध्या त्यांच्या वक्तव्यामुळे जोरदार चर्चेत आहेत. त्यांनी नुकतेच काही खुलासे केले आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. यावेळी त्यांनी अक्षय कुमारवरही निशाणा साधला आहे. नेमकं प्रकरण काय आहे जाणून घ्या
जेव्हा २०२३ मध्ये ‘OMG 2‘ प्रदर्शित होणार होता, तेव्हा त्याला CBFC कडून मोठ्या वादाला सामोरे जावे लागले. चित्रपटात धार्मिक विषय आणि लैंगिक शिक्षणाचे मिश्रण केल्याबद्दल आक्षेप घेण्यात आले होते. चित्रपटावर बंदी घालण्याचीही चर्चा होती. काही बदलांनंतर, OMG 2 ला ‘A’ प्रमाणपत्र मिळाले आणि तो प्रदर्शित झाला. अनेक संवाद आणि शब्द बदलण्यात आले होते. आता, परेश रावल यांनी त्या चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. अभिनेत्याने सांगितले की, OMG 2 ही त्यांची कल्पना होती, पण अक्षय कुमारने त्यांच्याकडून पटकथा घेतली आणि त्यांना श्रेयही दिले नाही.
परेश रावल यांनी असाही दावा केला आहे की, जर निर्मात्यांनी त्यांच्या मूळ कथेला धरून काम केले असते, तर बराचसा वाद टाळता आला असता. अभिनेत्याचा दावा आहे की, त्यांची कथा वडील-मुलाच्या नात्यावर आधारित होती आणि त्यात कोणत्याही दैवी हस्तक्षेपाचा समावेश नव्हता. अक्षय कुमार या प्रोजेक्टचा भाग झाल्यानंतर या स्क्रिप्टमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आणि त्यामुळेच त्यांनी या चित्रपटातून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय असंही त्यांनी नमूद केले आहे.
विकी लालवाणी यांना दिलेल्या एका मुलाखतीत परेश रावल यांनी दावा केला की, ‘OMG 2’ बनलेल्या चित्रपटाची मूळ कथा त्यांनीच तयार केली होती. त्यांनी ही कल्पना दिग्दर्शक अमित राय यांच्यासोबत शेअर केली आणि त्यांच्यासोबत मिळून पटकथा विकसित केली. मात्र, अक्षय कुमार या प्रोजेक्टमध्ये सामील झाल्यानंतर कथेने वेगळे वळण घेतले. परेश रावल यांच्या मते, कथेत देवाची कोणतीही भूमिका नव्हती. ते म्हणाले, “मी ‘रोड टू संगम’चे दिग्दर्शक अमित राय यांच्याशी संपर्क साधला आणि विचारले की ते दुसरा चित्रपट बनवण्याचा विचार करत आहेत का. मी त्यांचा खूप आदर करतो. मी त्यांना सांगितले की माझ्याकडे एक कल्पना आहे. चला एकत्र बसून ती लिहूया. मी त्यांना सांगितले की, जरी मी लेखक नसलो तरी, मी कल्पना देऊ शकेन आणि आपण कुठे चुकत आहोत हे ओळखायला मदत करू शकेन, कारण मला पटकथा काही प्रमाणात समजते.”
परेश रावल यांनी पुढे स्पष्ट केले, “ही कथा एका मुलाची होती, ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतो, ज्यामुळे त्याचे आयुष्य कठीण होते. त्याचे वडील खजुराहो मंदिरात पर्यटक मार्गदर्शक होते. अमितने त्याला महाकाल मंदिरात अर्धवेळ पुजारी होण्याचा सल्ला दिला. आम्ही एकत्र मिळून पटकथा तयार केली आणि त्यात तज्ज्ञ डॉ. प्रकाश कोठारी यांचाही समावेश केला. आमच्या अनेक मिटिंग झाल्या, कारण आमचा उद्देश चित्रपट शैक्षणिक आणि मनोरंजक बनवण्याचा होता, अश्लील बनवण्याचा नाही. आम्ही या प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी होतो.”
पुढे बोलताना परेश रावल यांनी सांगितले की, अक्षय सोबत माझं बोलण झाले तेव्हा त्याने मला हा चित्रपट करण्यास विनंती केली होती. पण मी त्याला नाही म्हणालो. मी जसा विचार केला होता तसा हा चित्रपट नाही. या कथेत ईश्वाराची काही भूमिका नव्हती. त्याने माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण मी सुरूवातीपासूनच या पटकथेच्या प्रक्रियेत सहभागी होतो. त्यामुळे ही कथा नेमकी कशी असायाला हवं हे मला पक्कं ठाऊक होतं. म्हणून मी या चित्रपटातून बाहर पडलो. अखेर, या चित्रपटात वडिलांची भूमिका पंकड त्रिपाठी यांनी साकारली होती, तर अक्षय कुमार शिवाचा दूत म्हणून पडद्यावर दिसला.