
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोनू निगम हा बॉलीवूड मधला सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. त्याच्या आवाजाने त्याला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. तो पाकिस्तानातही खूप लोकप्रिय आहे. सोनू एकदा एका कॉन्सर्टसाठी पाकिस्तानाला गेले होता. त्याचा कॉन्सर्ट कराचीमधील एका लष्करी परिसरात होणार होता. त्याने आपल्या कुटुंबालाही सोबत नेले होते. कॉन्सर्टच्या अगदी आधी, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. तो आणि त्याचे कुटुंब ज्या बसमधून प्रवास करत होते, त्या बसच्या शेजारी असलेल्या एका कारमध्येही बॉम्बस्फोट झाला.
प्रसिद्ध गायक सोनू निगमने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात, त्याने २००४ च्या कराची कॉन्सर्ट स्फोटाच्या भीषण आठवणींना उजाळा दिला आहे. ही घटना १० एप्रिल २००४ रोजी घडली होती, जेव्हा तो पाकिस्तान दौऱ्यावर होता आणि कराचीमध्ये त्याचा एक लाईव्ह कॉन्सर्ट नियोजित होता. हा छोटा व्हिडिओ त्या दिवसाची संपूर्ण कहाणी एका माहितीपटाप्रमाणे सांगतो. मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्सर्ट सुरू होण्याच्या काही वेळ आधी, कार्यक्रमस्थळाजवळ एक शक्तिशाली स्फोट झाला, ज्यात अनेक लोक जखमी झाले आणि काहींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तथापि, सुरक्षा वाढवल्यानंतर, कार्यक्रम रद्द न करता तो पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बॉम्बस्फोटातून गायक थोडक्यात बचावला. त्याने या घटनेबद्दल यापूर्वीही भाष्य केले आहे. आता, त्याने एक रील पुन्हा शेअर केली आहे. ही रील पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव अर्स्लान खान आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोनू निगमच्या पाकिस्तानमधील कॉन्सर्टच्या अनेक रील्स शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी फुरकान स्पष्ट करतो की, दरवर्षी १० एप्रिलला त्याला ‘आपण भाऊ आहोत. आपण एकत्र मृत्यूवर मात केली,’ असा संदेश यायचा. त्याने सांगितले की, सेटवर सोनू म्हणाला होता, ‘माझ्यावर इथे हल्ला झाला होता, पण पाकिस्तानने मला वाचवले.’मंचावर पोहोचल्यावर सोनू म्हणाला, “मी तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. मला या कार्यक्रमाची सुरुवात या वाक्याने करायची आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील लोक खूप दुर्दैवी ठरले आहेत. ज्यांच्यावर आपण खूप प्रेम केले, ते भारतात असोत वा पाकिस्तानात, अनेक वर्षांपासून बेपत्ता आहेत. कृपया प्रार्थना करा की आपले प्रेम कायम वाढत राहो.”
लाल सिंह चड्ढा” नंतर नागा चैतन्य हिंदी चित्रपटांपासून दूर; अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…
व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “१० एप्रिलला फक्त दहा दिवस उरले आहेत. १० एप्रिल २००४ रोजी कराचीमध्ये सोनू भैय्याच्या दौऱ्यादरम्यान काय घडले, यावर एक छोटा माहितीपट.” यात सोनू निगमच्या नियोजित कॉन्सर्टजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचे वर्णन आहे, ज्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाले होते. या घटनेनंतरही सोनूने कार्यक्रम सादर केला.त्यानंतर सोनू निगमने गायले, “‘क्या बेबसी है ये क्या हैं मजबूरियां, हम पास हैं फिर भी कितनी हैं दूरियां.’ .” यावर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि शिट्ट्या वाजवल्या. सोनूने त्याची अनेक गाजलेली गाणी गायली.