
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
“द केरळ स्टोरी २” या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. ट्रेलरमध्ये एका मुस्लिम कुटुंबाकडून मुख्य भूमिकेतील अभिनेत्रीला जबरदस्तीने गोमांस खायला घातले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट २७ फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. रविवारी, अभिनेता प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर चित्रपटाभोवती सुरू असलेल्या वादाबद्दल ट्विट केले आहे.
अभिनेता प्रकाश राज यांनी आपल्या सोशल मीडियावर या वादाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवर पोर्क, गोमांस आणि मासे यांच्या पदार्थांचे फोटो शेअर करत लिहिले, “खरी #केरळस्टोरी म्हणजे पोर्क, गोमांस आणि मासे हे शाकाहारी जेवणासोबत एकत्र नांदतात आणि आनंदाने राहतात. कृपया याचा आनंद घ्या. सर्वांना रविवारीच्या शुभेच्छा.” असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
“लक्ष्या मला स्ट्रेट फॉलो करायचा…” अशोक सराफांचे वक्तव्य! “मी हिरो तर तो माझा भाऊ, ड्राइव्हर…”
अनुराग कश्यप यांनीही केली चित्रपटावर टीका
यापूर्वी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी “द केरळ स्टोरी २” या चित्रपटाबद्दल तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत म्हटले होते, “केरळ स्टोरी हा एक अतिशय वाईट चित्रपट आहे. हा केवळ प्रचारासाठी बनवलेला आहे. पूर्णपणे निरर्थक आहे. असे कोण बीफ खायला घालतो? असे तर कोणी खिचडीसुद्धा खायला घालत नाही.”
केरळच्या मुख्यमंत्र्यांनीही केली टीका
काही दिवसांपूर्वी पिनारायी विजयन यांनीही चित्रपटाचा निषेध करत निवेदन जारी केले होते. त्यांनी म्हटले, “केरळला दहशतवादाचे केंद्र म्हणून दाखवण्याच्या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून फेटाळून लावले पाहिजे. केरळ हा धार्मिक सलोख्याचा प्रदेश आहे, शाश्वत विकासात आघाडीवर आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आदर्श मानला जातो.”
The real #KeralaStory is how pork, beef and fish coexist with vegetarian sadya and all of them live in harmony. Please relish 😍😍😍 #justasking happy Sunday everyone ❤️❤️ pic.twitter.com/Ea2JCPd6n6 — Prakash Raj (@prakashraaj) February 22, 2026
‘द केरळ स्टोरी २’ चे दिग्दर्शक काय म्हणाले
एचटीला दिलेल्या एका निवेदनात विपुल अमृतलाल शहा यांनी सांगितले की हा चित्रपट भारतीय कायदेशीर व्यवस्थेशी संबंधित वास्तविक प्रकरणांवर आधारित आहे. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही ‘द केरल स्टोरी: गोज बियॉन्ड’सारखा चित्रपट बनवला, तेव्हा तो भारतातील व्यापक परिस्थितीचे अधिक प्रभावी प्रतिनिधित्व करेल, अशी आमची इच्छा होती. म्हणूनच आम्ही ज्या तीन कथांची निवड केली, त्या केवळ त्यांच्यापुरत्याच मर्यादित ठेवू शकलो नाही. अनेक मुलींच्या आयुष्यातील विविध घटनांचा समावेश करून त्यांना या कथांचा भाग बनवले आहे. परिणामी, हा चित्रपट जरी तीन मुलींची कथा सांगत असला, तरी त्यात अनेक अनुभवांच्या आणि वास्तव घटनांची झलक पाहायला मिळणार आहे.”
‘द केरळ स्टोरी २’ ची कथा आणि प्रदर्शन तारीख
दरम्यान, ‘द केरळ स्टोरी २’ या चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) कडून ‘यू/ए’ प्रमाणपत्र मिळाले आहे. हा चित्रपट जबरदस्तीने धर्मांतर रॅकेटमध्ये अडकलेल्या मुलींची कथा सांगतो. चित्रपट निर्माते म्हणतात की हा चित्रपट भारतीय कायदेशीर व्यवस्थेशी संबंधित खऱ्या घटनांवर आधारित आहे. ‘द केरळ स्टोरी २’ २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.