
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यावर्षीच्या पहिल्या सहामाहीत (First Half) त्यांच्या या विचारसरणीला आणखी बळ मिळाले आहे. विपुल अमृतलाल शाह यांनी दोन मोठे हिट चित्रपट दिले आहेत— ‘द केरळा स्टोरी 2: गोज बियॉन्ड’, ज्याचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केले आहे, आणि ‘गव्हर्नर’, ज्याचे दिग्दर्शन चिन्मय डी. मांडलेकर यांनी केले आहे. वर्षाच्या या यशस्वी सुरुवातीबद्दल बोलताना त्यांनी नवोदित चित्रपट निर्मात्यांवर विश्वास व्यक्त करत भारतीय चित्रपटसृष्टीतील नव्या प्रतिभेला संधी देण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल भाष्य केले.
विपुल अमृतलाल शाह म्हणाले, “सिनेमा त्याच्या सर्वोत्तम रूपात तेव्हाच समोर येतो, जेव्हा तो नव्या दृष्टिकोनातून सादर केला जातो. वर्षाची ही सुरुवात माझ्यासाठी अत्यंत आनंददायी ठरली आहे, कारण माझे दोन्ही चित्रपट ‘द केरळा स्टोरी 2’ आणि ‘गव्हर्नर’ हे इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नवोदित दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यांनी अप्रतिम काम केले असून नव्या प्रतिभेलाही उत्कृष्ट सिनेमा घडवता येतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.”
ते पुढे म्हणाले, “माझा विश्वास नेहमीच केवळ अनुभवावर नसून प्रामाणिकपणा, ठाम निर्धार आणि वेगळ्या विचारसरणीवर राहिला आहे. आम्ही आगामी प्रोजेक्ट्सकडे वाटचाल करत असताना नव्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि ओरिजिनल स्टोरीटेलर्सना त्यांना मिळायला हवे असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मी पूर्णपणे कटिबद्ध आहे.”
गंभीर आणि प्रभावी विषयांवर आधारित या दोन्ही चित्रपटांना मोठे यश मिळाले असून, समाजावर प्रभाव टाकणारे चित्रपट बनवण्याच्या विपुल अमृतलाल शाह यांच्या प्रवासाला त्यामुळे आणखी बळ मिळाले आहे.
या यशाची परंपरा पुढे नेत, या चित्रपट निर्मात्याकडे आगामी काळात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. त्यामध्ये अक्षय कुमार अभिनीत बहुचर्चित एलियन अॅक्शन-थ्रिलर ‘सामुक’चाही समावेश आहे. या चित्रपटाद्वारे ते व्यावसायिक भारतीय सिनेमातील आतापर्यंत फारसा न हाताळलेल्या शैलीत पाऊल ठेवत आहेत. दमदार, वास्तववादी अॅक्शनसोबतच प्रेक्षकांना नेत्रदीपक दृश्ये आणि एका अनोख्या विश्वाचा अनुभव देण्याचा या चित्रपटाचा प्रयत्न असेल.