
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
भारतीय सिनेसृष्टीत सध्या एका भव्य आणि बहुप्रतिक्षित प्रोजेक्टची जोरदार चर्चा रंगलेली दिसत आहे. ती म्हणजे ‘रामायण’ या सुपरहिट आगामी चित्रपटाची. निर्माता नमित मल्होत्रा यांच्या या महाकाय सिनेमाने आधीच प्रेक्षकांचे मन जिंकायला सुरुवात केली आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका खास व्हिडिओमुळे देशभरात ‘राम’चा जयघोष घुमताना पाहायला मिळतो आहे.
बेंगळुरू, अहमदाबाद, भोपाळ, चेन्नई, दिल्ली, गुवाहाटी, जयपूर, कोची, कोलकाता, मेरठ, मुंबई, पुणे, सीतामढी, कडप्पा, हैदराबाद, पानिपत, ग्वाल्हेर आणि बठिंडा अशा अनेक शहरांमध्ये या चित्रपटाची झलक दाखवण्यात आली. विशेष म्हणजे, 14 शहरांबरोबरच 5 मंदिरांमध्येही चित्रपटाची ही झलक सादर करण्यात आली आहे. या प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद अक्षरशः अंगावर शहारे आणणारा होता. सध्या सर्वत्र एकच नाद घुमत असताना दिसत आहे.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारी लोकांची भावनिक प्रतिक्रिया पाहून स्पष्ट होते की, हा चित्रपट केवळ एक सिनेमॅटिक प्रोजेक्ट नसून एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. भगवान रामांच्या दर्शनाने भारावून गेलेले प्रेक्षक, जयघोष करताना दिसत आहेत. जणू काही एखाद्या उत्सवाचाच माहोल निर्माण झाला होता.
या भव्य प्रोजेक्टचे दिग्दर्शन नमित मल्होत्रा करत आहेत. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या आणि कथानकाच्या दृष्टीनेही अत्यंत भव्य असणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत Prime Focus, DNEG (8 वेळा ऑस्कर विजेते) आणि मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स यांचा सहभाग आहे, ज्यामुळे या प्रोजेक्टची भव्यता आणखी वाढली आहे.
चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाल्यास, यात रणबीर कपूर भगवान रामांच्या भूमिकेत दिसणार आहेत, तर साई पल्लवी माता सीतेच्या भूमिकेत झळकणार आहेत. तसेच यश रावणाच्या प्रभावी भूमिकेत झळकणार असून, सनी देओल हनुमानाच्या रूपात आणि रवी दुबे लक्ष्मणाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग 2026 च्या दिवाळीत तर दुसरा भाग 2027 च्या दिवाळीत जगभरातील IMAX सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाद्वारे प्राचीन महाकाव्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने नव्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय संस्कृतीची ओळख अधिक ठळकपणे समोर येईल.
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आलेल्या या झलकने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओसोबत शेअर करण्यात आलेल्या कॅप्शनमध्ये ‘14 शहरं, 5 मंदिरे, अब्जावधी हृदये, एकच भावना—राम’ असा उल्लेख करण्यात आला आहे, जो या प्रोजेक्टच्या प्रभावाची साक्ष देतो. एकंदरीत, ‘रामायण’ हा चित्रपट केवळ एक सिनेमा नसून एक भव्य सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. प्रेक्षकांच्या भावना, श्रद्धा आणि आधुनिक सिनेमॅटिक अनुभव यांचा संगम असलेला हा प्रोजेक्ट 2026 मधील सर्वात मोठा आणि संस्मरणीय सिनेमॅटिक इव्हेंट ठरण्याची पूर्ण शक्यता आहे.