
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
या कार्यक्रमात बंगाल, बिहार, भिलवाडा, गंगापूर, राजकोट, उदयपूर, जम्मू, महाराष्ट्र, भोपाल, झारखंड, फरीदाबाद, मेरठ, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि इंदूर आदी ठिकाणांहून लोक सहभागी झाले होते. आयोजकांच्या माहितीनुसार, 55 मुली आणि 33 कुटुंबीयांनी पुढे येत आपले अनुभव मांडले. त्यापैकी 49 जण मंचावर उपस्थित होते, तर इतर काही जण प्रेक्षकांमध्ये बसले होते. या सभेला सर्व्हायव्हर्स आणि कथित मृत मुलींच्या कुटुंबीयांचा संयुक्त समूह म्हणून संबोधण्यात आले.
Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो
पत्रकार परिषदेत चित्रपटाची टीमही मोठ्या संख्येने उपस्थित होती. निर्माता विपुल अमृतलाल शहा दिग्दर्शक कामाक्ष नारायण सिंह सह-निर्माता आशिन ए. शाह तसेच प्रमुख कलाकारउल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया या अभिनेत्री देखील उपस्थित राहिल्या होत्या. निर्माते आणि कलाकारांनी पीडितांच्या अनुभवांकडे गांभीर्याने लक्ष देत या विषयावर समाजात संवाद घडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून एका सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. चित्रपटात तीन हिंदू मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. त्या प्रेमसंबंधांत अडकतात आणि पुढे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर वळण घेते. कथानकात धर्मांतराच्या कथित सुनियोजित प्रक्रियेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.
हा चित्रपट कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे, ज्यामुळे व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘केरळ स्टोरी २ – गोज बियॉन्ड’ या चित्रपटाची निर्मिती सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली करण्यात आली असून हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या पत्रकार परिषदेमुळे विषय चर्चेत आला असून, समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षक यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.