Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्डकप
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘साबर बोंडं’ कसा झाला तयार, दिग्दर्शक रोहन कानवडेशी खास बातचीत; Vision उतरवले सत्यात

दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्या ‘साबर बोंडं’ हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नवराष्ट्रशी दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी खूप गप्पा मारल्या असून, त्यांचा संपूर्ण चित्रपबद्दल प्रवास सांगितला आहे

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 10, 2025 | 06:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दिग्दर्शक रोहन कानवडे यांच्या ‘साबर बोंडं’ या चित्रपटाने सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ग्रँण्ड ज्युरी प्राईज हा सर्वोच्च सन्मान पटकावून इतिहास रचला आहे. हा पुरस्कार मिळणारा ‘साबर बोंडं’ हा पहिला भारतीय कथाभाष्यपट (फिक्शन) चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवाणे यांसारख्या नामांकित कार्यकारी निर्मात्यांची भक्कम साथ मिळाली आहे. तसेच हा चित्रपट येत्या १९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. नवराष्ट्रशी दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी वेळात वेळ काढून गप्पा मारल्या आहेत आणि त्याच्या संपूर्ण चित्रपटाचा प्रवास सांगितला आहे.

सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाने इतिहास रचला आहे या बद्दल काय सांगाल?
उत्तर : सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘साबर बोंडं’ चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकले. आणि या सगळ्या पुरस्कारमुळे चित्रपटाला एक वेगळी ओळख मिळत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. ‘साबर बोंडं’ चित्रपटाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आहे. आणि आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची कथा सिनेगृहात जाणून अनुभवता येणार आहे. एका दिग्दर्शकाचं नेहमीच एक स्वप्न असतं की आपला चित्रपट चित्रपटगृहाद्वारे प्रेक्षकांनी पाहावा आणि त्याला भरभरून प्रेम द्यावे. आणि हे स्वप्न अखेर पूर्ण होतं आहे याचा मला खूप आनंद झाला आहे.

‘साबर बोंडं’ हा तुमचा पहिला चित्रपट आहे तर हा चित्रपट करताना काय अनुभव होता?
उत्तर : माझ्या घरात कोणाला दिग्दर्शनाची आवड नाही आहे, तसेच ना ही मी दिग्दर्शनाचा अभ्यास केला आहे. आणि हे सगळं असूनही मला चित्रपट करण्याची मनात इच्छा निर्माण झाली. हा चित्रपट करण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. आम्ही या चित्रपटावर ५ वर्ष काम केलं आहे. आणि आता २०२५ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होत आहे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. चित्रपटाचे काम सुरु करण्याआधी मला आधी खूप नकार मिळाले, आणि असे असताना मला अनेक वेळा प्रश्न पडला की असं असताना पुढे जाईल का हा चित्रपट? कथा आवडेल का प्रेक्षकांना? परंतु चित्रपटाने अनेक पुरस्कार प्राप्त केले. आणि पुढील यशाचा मार्ग सोपा केला.

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’

हा चित्रपट मैत्री आणि प्रेमावर भाष्य करणारा आहे तर या चित्रपटाची कल्पना तुम्हाला कशी सुचली?
उत्तर : माझा जन्म मुंबईचा आहे मी लहानाचा मोठा मुंबईमध्येच झालो. लहान असतानाही मी अनेकवेळा गावी गेलो आहे. पण १० नंतर मी गावी गेलो नाही आणि एकदा अचानक माझ्या वडिलांचे अकाली निधन झाले. आणि तेव्हा मी आईसोबत गावी गेलो होती. आणि मला आठवतंय मी २३ वर्षांचा होतो तेव्हा मला गावातील माणसं नेहमी माझ्या लग्नाबद्दल विचारात असे, माझ्या आईला देखील माझ्या लग्नाची विचारपूस करत असे. आणि त्यानंतर मी गावी जाणं टाळायला लागतो. मी त्यानंतर गावी कधी जास्त गेलोच नाही. मला माझ्या घरातील कुटुंबाला आणि नातेवाईकांना माझ्या सेक्शुअलिटी बद्दल सांगायचे नव्हते, कारण ते असे रिॲक्ट करतील याची मला कल्पना नव्हता. पंरतु लग्न का करत नाही आहेस? या प्रश्नाचं माझ्यावर इतकं प्रेशर झालं की मला असं वाटू लागलं की जर माझा या गावामध्ये कोणता मित्र असता आणि त्याला याबद्दल सगळी कल्पना असती तर काय झालं असतं? असे विचार माझ्या डोक्यात येऊ लागले आणि या चित्रपटाची कथा तयार झाली.

साबर बोंड म्हणजे नक्की काय? सामान्यांसाठी आणि Gen Z साठी हा शब्द तसा नवा आहे
उत्तर : माझं असं सांगणं आहे या चित्रपटाचं नाव साबर बोंड असं का आहे हे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाणून हा चित्रपट पाहून जाणून घेतलं पाहिजे. कारण जेव्हा हा चित्रपट प्रेक्षक समोरून अनुभवातील तेव्हा त्या नात्यांची गोष्ट आणि चित्रपटाची कथा त्यांना समजेल आणि या चित्रपटाचे नाव असे का आहे हे समजेल. तरीही सांगायचं झालं साबर बोंड हे एक फळाचं नाव आहे. आणि या फळांचे खूप फायदे देखील आहे. तरं प्रेक्षक जेव्हा चित्रपट पाहतील तेव्हा त्यांना समजेल की चित्रपटामधील पात्र देखील तसेच आहे. तसेच या चित्रपटामध्ये मुख्य दोन पात्र आहेत त्यांना खूप कठीण परिस्थितून जावं लागत आणि यानंतर ते खऱ्या नात्याला सुरुवात होते. त्यांचं मैत्रीचं नातं आणखी घट्ट होत जात.

नागराज मंजुळे, निखिल अडवाणी, सई ताम्हणकर आणि विक्रमादित्य मोटवाणे अशी मोठी नावं समोर येत आहेत, तर त्यांची साथ कशी मिळाली?
उत्तर : चित्रपट तयार होत असताना सईला आणि नागराज सरांना माहित होतं की चित्रपट बनत आहे. आणि माझी खूप इच्छा होती या चित्रपटाला चांगल्या मोठ्या कलाकारांनी साथ मिळावी. आणि ते शक्य झालं, आणि चित्रपट तयार होण्यासाठी आणखी हातभार लागला. ‘साबर बोंडं’ चित्रपट आणखी चांगला तयार झाला.

गाणं कडकडीत.. प्रेम झणझणीत…!‘वडापाव’ चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज

रोहनच्या स्वतःच्या आयुष्यातील काही अनुभवांचा या चित्रपटासाठी उपयोग झाला का?
उत्तर : खरं सांगायचं तर या चित्रपटाची कथा ही १०% माझ्या आयुष्याशी संबंधित आहे. आणि बाकी चित्रपटाची संपूर्ण कथा ही माझ्या कल्पनेमुळे सुचली आहे. तसेच चित्रपटामध्ये मी सगळे बद्दल घडून आणले आहेत, सगळ्याच गोष्टी या माझ्या आयुष्यातील परफेक्ट कथा नाही आहे. खूप विचार करून आणि खूप भावनेने ही गोष्ट मी तयार केली आहे. तसेच चित्रपटामध्ये प्रेम कथा दाखवण्यात आली आहे ती माझी कल्पना आहे करत माझ्या खऱ्या आयुष्यात असं कधी झालं नव्हतं. चित्रपटाची संपूर्ण कथा ही प्रेरणादायी आहे.

पुढचा प्रोजेक्ट काय असेल?
उत्तर : माझी नावापासून इच्छा आहे की भारतीय लोकांनी माझ्या याच पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळावा. या चित्रपटाला त्यांचे भरभरून प्रेम मिळावे. माझ्यासाठी ही नुकतीच सुरुवात आहे, आता हे नवीन प्रोजेक्ट येतील ते मला वाटेल की आपण हे करायला हवं तेव्हा मी नक्कीच घेऊन येईल. पण तो पर्येंत मला अजून खूप काही पुढे शिकायचं आहे, खूप काही काम करायचं बाकी आहे. आता सध्याला मला एवढाच वाटतं की आता हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होतोय त्याला प्रेक्षकांनी खूप प्रेम द्यावे.

Web Title: Exclusive how sabar bonda was made a special conversation with director rohan kanawade

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi cinema
  • marathi movie

संबंधित बातम्या

गाणं कडकडीत.. प्रेम झणझणीत…!‘वडापाव’ चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज
1

गाणं कडकडीत.. प्रेम झणझणीत…!‘वडापाव’ चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’
2

ऐश्वर्यानंतर आता अभिषेक बच्चनही उच्च न्यायालयात हजर, बनावट कंटेंट बनली डोकेदुखी; म्हणाला ‘नावाचा गैरवापर…’

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ चा ट्रेलर रिलीज, विनोदासोबत उलघडणार शेतकऱ्यांची वेदनादायी कथा
3

Jolly LLB 3: ‘जॉली एलएलबी ३’ चा ट्रेलर रिलीज, विनोदासोबत उलघडणार शेतकऱ्यांची वेदनादायी कथा

करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी
4

करिश्मा कपूरच्या मुलांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे कडक आदेश, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.