(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने नुकताच ५० वा वाढदिवस आणि इंडस्ट्रीतील २५ वर्षांचे योगदान एकत्रितपणे साजरे केले. हा जुळून आलेला योग त्याने मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा केला.
या खास सोहळ्यात राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक मंडळींची उपस्थित होती, तसेच इंडस्ट्रीतील कलाकार देखील त्याला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. त्याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.
सुबोध भावे याने एक खास पोस्ट शेअर करून उपस्थितांचे आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. याशिवाय, ५० व्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम सुरू करण्याचीही त्याने घोषणा केली आहे, ज्यामुळे हा दिवस आणखी विशेष बनला आहे. सुबोध भावेच्या वाढदिवसाची खास पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या उपक्रमाचे अनेक चाहत्यांनी त्याचे कौतुक देखील केले आहे. आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.
Singer Palak Muchhal: गायिका पलक मुछालचे नाव गिनीज बुकमध्ये, ३८०० हून अधिक मुलांवर हृदय शस्त्रक्रिया!
सुबोध भावे ने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, काल माझा 50 वा जन्मदिवस आणि कलेच्या क्षेत्रातला 25 वर्षांचा प्रवास एकत्र साजरा केला.
अर्थात माझे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व माध्यमातील माझे निर्माते, दिग्दर्शक,लेखक, माझे सहकलाकार, पडद्यावरील व पडद्यामागील.ज्यांच्यामुळे मी घडतोय ते सर्व उपस्थित होते.
त्याचबरोबर समाजाच्या विविध क्षेत्रातील व्यक्ति ज्यांच्यामुळे मी अनेक गोष्टी शिकलो ते ही उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार जी, माझे जेष्ठ दिग्दर्शक गोविंद नीहलानी, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, मा.उद्धव ठाकरे साहेब, मा.राज ठाकरे साहेब, खासदार नरेश म्हस्के, सचिन जी, जेष्ठ अभिनेत्री सुहास जोशी,अनेक पोलिस अधिकारी,न्यूज माध्यमातील अनेक मित्र.
कालचा दिवस संस्मरणीय केल्याबद्दलत्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. माझ्यावर प्रेम करणार्या तुम्हा सर्वांचेही मनःपूर्वक आभार . तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या. पण सर्वांना वैयक्तिक रीत्या त्याची पोचपावती देणे शक्य होत नाहिये. म्हणून या माध्यामातून तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. आपला आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम राहू दे
खरंतर आपण केलेली मदत जाहीर करायची नसते. पण या वेळेस मुद्दाम करतोय.गेली काही वर्षं करतच होतो, पण आता जे ठरवलय ते जाहीर करावसं वाटतय कारण त्या मुळे ज्या संस्थांसाठी आणि मुख्य म्हणजे माणसांसाठी करतोय त्यांना त्याचा फायदा व्हावा.25 वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय.समाजाप्रति आपली जबाबदारी ओळखून काम करतोय.पण आता त्याचा विस्तार करावासा वाटला.असं ठरवलं की 25 वर्ष मला काम करून झाली त्यामुळे पुढचे 25 महिने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या घटकांसाठी काम करणार्या सामाजिक संस्थाना आर्थिक सहाय्य करावे. त्याचा भाग म्हणून काल माझ्या जन्मदिनानिमित्त बीड जिल्ह्यात अनाथ मुलांसाठी काम करणार्या “शांतीवन ” या संस्थेच्या नागरगोजे सर यांना मा.सांस्कृतिक मंत्री आशिष जी शेलार यांच्या उपस्थितीत पहिला धनादेश दिला.आता दर महिन्याला एका सामाजिक संस्थेला हा धनादेश नियमित देण्यात येईल आणि त्या संस्थेची माहिती आणि बँक डिटेल्स ही देण्यात येतील. तुम्हालाही सहाय्य करावसं वाटलं तर जरूर करा.
शांतिवन साठी आपण दिलेली मदत आयकर कायदा 80 G नुसार करमुक्त आहे.त्याची रितसर पावती आम्ही आपल्याकडे पाठवण्यात येईल.
पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार.
प्रेम ❤️
आपलाच
‘ऊत’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज, जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा झळकणार मोठ्या पडद्यावर






