(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“मनाचे श्लोक” हा चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने निर्मित केला होता. तिचा चित्रपट प्रदर्शित होताच वादात सापडला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, काही लोकांनी छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी “मनाचे श्लोक” चे थिएटर प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न केला. दिग्दर्शक मृण्मयी यामुळे खूप निराश झाली आहे. एवढेच नाही तर चित्रपटाचे पोस्टर्स देखील फाडण्यात आले. आता या सगळ्याप्रकारणी अभिनेत्री मृण्मयीने मोठे निर्णय घेतला आहे.
संत-कवी रामदास स्वामी यांच्या अपमानाशी संबंधित प्रकरण
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यात एका संघटनेशी संबंधित व्यक्ती “मनाचे श्लोक” चित्रपटाचे थिएटर प्रदर्शन रोखत असल्याचे दाखवले आहे. या व्यक्तींचा आरोप आहे की हा चित्रपट संत-कवी समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रसिद्ध श्लोक संग्रहावर आधारित आहे. त्यांचा असा विश्वास आहे की चित्रपटाचे शीर्षक संतांचा अपमान करते. परंतु हे नाव कोणच्याही अपमानाशी संबंधित असून ते चित्रपटामधील पात्र श्लोक आणि मानवा यांच्या मनात चालेल्या गोष्टींबद्दल हे शीर्षक देण्यात आले असल्याचे टीमचे म्हणणे आहे.
मृण्मयीने जाहीर केली नवी तारीख
दिग्दर्शक मृण्मयी देशपांडेने नुकतेच इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे चाहत्यांना माहिती दिली क तिचा चित्रपट लवकरच नवीन शीर्षकासह प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १६ ऑक्टोबर रोजी पुन्हा चित्रपटगृहात दिसणार आहे. वापरकर्त्यांनीही दिग्दर्शकाच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत तिच्या या निर्णयाचे कौतुक केले आहे.
दीपिका पादुकोणच्या ८ तासांच्या शिफ्टच्या मागणीनंतर ‘या’ अभिनेत्रीने केली ‘वीक ऑफ’ची मागणी!
दरम्यान, ‘मनाचे श्लोक’ हा सिनेमा कौटुंबिक असून तो नातेसंबंधांवर आधारित आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे, करण परब यांसारखे तरुण कलाकार देखील दिसणार आहेत, तर लीना भागवत, मंगेश कदम आणि शुभांगी गोखले असे ज्येष्ठ कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत असून, हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.