Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वच्छीने अचानक का सोडली ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका? अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं…

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेमध्ये वच्छीचे पात्र संजीवनी पाटीलने साकारलं होतं. अभिनेत्री संजीवनी पाटीलने नुकतीच एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 19, 2025 | 08:07 PM
वच्छीने अचानक का सोडली ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका? अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं...

वच्छीने अचानक का सोडली ‘रात्रीस खेळ चाले’ मालिका? अभिनेत्रीने जरा स्पष्टच सांगितलं...

Follow Us
Close
Follow Us:

‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता. दरम्यान, मालिकेसह मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलंय. लोकप्रिय पात्रांपैकी काही पात्र म्हणजे, आण्णा नाईक, शेवंता आणि वच्छी… ही तिनही पात्र प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले.

“तो स्वतःला बाथरुममध्ये बंद करुन घ्यायचा कारण..”; राकेश रोशन यांनी हृतिकविषयी केला मोठा खुलासा

या मालिकेचे आजवर तीन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेऊन फार काळ उलटला असून सध्या सोशल मीडियावर मालिकेतील वच्छी कमालीची चर्चेत आली आहे. मालिकेमध्ये वच्छीचे पात्र संजीवनी पाटीलने साकारलं होतं. अभिनेत्री संजीवनी पाटीलने नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. वच्छी पात्राचा मृत्यू झाल्याचा सीक्वेन्स ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या भागात दाखवण्यात आला होता. पण, ही मूळ कथा नसून संजीवनीने मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्याने हे पात्र मालिकेत मारलं गेलं, असं अभिनेत्री मुलाखतीत म्हणालीये.

IPL 2025 Opening Ceremony: आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटी दाखवणार जलवा, सलमान खानसह ‘हे’ कलाकार होणार सहभागी

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री अभिनेत्री संजीवनी पाटील म्हणाली की, “मला तो झी मराठीचा ‘सर्वोत्कृष्ट खलनायिके’चा मिळालेला पुरस्कार आज घरात धूळ खात पडलाय. मी तो पुरस्कार घेऊन ऑडिशनसाठी फिरू का सगळीकडे मला ‘काम द्या…’ ‘काम द्या…’ असं म्हणत? मी ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या तिसऱ्या भागात काम करण्यासाठी ‘जय जय स्वामी समर्थ’ मालिका सोडली. पण, पैसे वाढवून मागितल्यावर सेटवर वेगळा अनुभव आला. माझं असं झालं की… तू जे काम करतेस ते अडीच-तीन हजारांचं काम आहे का? मला हळुहळू त्रास व्हायला सुरुवात झाली. माझी भूमिका यांनी मारली. मालिका सोडल्यावर तुला यापुढे कोण काम देतंय ते सुद्धा मी पाहतो असं मला सांगण्यात आलं.”

Sky Force ओटीटीवर होणार प्रदर्शित, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार चित्रपट!

दरम्यान, मुलाखतीत अभिनेत्रीने मराठी इंडस्ट्री विरुद्ध हिंदी इंडस्ट्रीचीही तुलना केली. अभिनेत्रीच्या ह्या वक्तव्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. अभिनेत्री संजीवनी पाटील मराठी टिव्ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. संजीवनी पाटीलने ‘रात्रीस खेळ चाले’च्या तिनही सीझनमध्ये त्याशिवाय ‘तुझा माझा ब्रेकअप’ नावाच्या टीव्ही मालिकेतही अभिनेत्रीने काम केलंय.

Web Title: Television actress sanjeevani patil reveals why she left the show ratris khel chale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 08:07 PM

Topics:  

  • Television Actress
  • tv serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

गौरी कुलकर्णीला लवकरच करायचं आहे लग्न! सांगितले ‘हे’ कारण; म्हणाली “जर कुणी चांगला मुलगा…”
1

गौरी कुलकर्णीला लवकरच करायचं आहे लग्न! सांगितले ‘हे’ कारण; म्हणाली “जर कुणी चांगला मुलगा…”

37 वर्षांनंतर Sargun Mehta होणार आई? Ravi Dubey च्या घरी येणार छोटा पाहुणा, सोशल मीडियावर चर्चांना उधाण
2

37 वर्षांनंतर Sargun Mehta होणार आई? Ravi Dubey च्या घरी येणार छोटा पाहुणा, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

अमृतसरमध्ये मोठा ट्विस्ट! ‘उडने की आशा’त सिमरनची धमाकेदार एंट्री; सचिन-सायलीच्या नात्यात नवे वादळ
3

अमृतसरमध्ये मोठा ट्विस्ट! ‘उडने की आशा’त सिमरनची धमाकेदार एंट्री; सचिन-सायलीच्या नात्यात नवे वादळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.