
फोटो सौजन्य - Social Media
मराठी लहान पडद्यावर आपले नाव उंच करणारी अभिनेत्री गौरी कुलकर्णी, तिने एका प्रसिद्ध मराठी वाहिनेला मुलखात दिली. या मुलाखतीत तिने अनेक मुद्दे मांडले त्यातील काही खाजगी होते. तिने लग्न, नोकरी तसेच कंटेंट क्रिएशन या सगळ्या मुद्द्यांवर खुलून भाष्य केले त्यामुळे ती सध्या तिच्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.
काय म्हणाली गौरी?
गौरी लग्नाबाबत म्हणताना म्हणाली की “तिला एकटेपणा भासतो. पण तिला आता लवकर लग्न करायचं आहे. याचे कारण एकटेपणा किंवा वाढतं वय मुळीच नाही. पण तिला करायचंय लग्न! एखादा चांगला मुलगा आयुष्यात आला आणि त्या दोघांमध्ये चांगलं समीकरण जुळलं तर गौरी लगेच लग्नाच्या तयारीला लागेल.” हे सगळं सांगताना गौरीने तिच्या आधीच्या जीवनाविषयीही सांगितले. तिने सांगितले की तिच्या आयुष्यात आधीही काही अनुभव आले आहेत. तिने त्यांच्यासाठी खूप काही केलं पण जेव्हा तिला गरज होती तेव्हा साथ द्यायला कुणी नाही आलं.
दरम्यान, गौरीने तिच्या नोकरीविषयीही खुलासा केला. गौरी अगोदर पुण्यात नोकरी करत होती. त्याचवेळी तिने ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेसाठी ऑडिशन दिले होते आणि मुख्य म्हणजे त्या ऑडिशनमध्ये तिची निवड झाली. मालिकेच्या मुख्य पात्रात काम करण्यासाठी गौरी शूटिंगच्यावेळी पुण्याहून मुंबईकडे यायची. नोकरी सांभाळत असताना ती मराठी TV सृष्टीत तिचे करिअरही घडवत होती पण हे सगळं करत असताना तिच्या नोकरीवर या सगळ्याचा ताण येऊ लागला आणि परिणाम झाला. कामात सातत्य नसल्याने, कधीही येणे आणि कधीही जाणे, या गोष्टीमुळे तिच्या नोकरीवरून तिला काढण्यात आले त्यांनतर गौरीने शूटिंग हाच एक मार्ग निवडला. तिने नोकरी करणे सोडून टाकले.
‘हे’ बनलं कमवण्याचं साधन
नोकरी सुटल्यानंतर गौरी मुंबईला रवाना झाला. मालिकाच तिचे ब्रेड बटर झाले तसेच गौरीने इतर कलाकारांसारखं कन्टेन्ट क्रिऍटिन्ग करणे सुरु केले. त्यातून तिला चांगलाच नफा होऊ लागला. सोशल मीडियावर ब्रँडचे प्रमोशन करणे यातून चांगले पैसे मिळू लागले. पण आई वडील बीडला राहतात आणि त्यांच्यापासून दूर एकटी रहाणे यामुळे एकटेपणा जाणवतो. अशामध्ये तिने लवकर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.