मराठीतील प्रसिद्ध अभिनेते (Marathi Veteran Actor) भालचंद्र कुलकर्णी (Bhalchandra Kulkarni) यांचे शनिवारी पहाटे कोल्हापुरातील (Kolhapur) राहत्या घरी निधन झाले (Passes Away). ते ८८ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत ३०० हून अधिक चित्रपट केले होते. यातील काही हिंदी चित्रपट होते तर बहुतांश मराठी चित्रपट होते.
कोल्हापुरातील चित्रपट कार्यकर्ते अर्जुन नलावडे म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावली आणि त्यांचे निधन झाले.”
[read_also content=”अरे देवा! धावत्या रेल्वेत संशयास्पद वस्तूचा स्फोट, संशयित बॅगधारक व्यक्ती चाळीसगाव येथेच झाला पसार, एक जखमी https://www.navarashtra.com/crime/big-breaking-suspicious-object-explodes-in-running-kushinagar-superfast-express-train-suspicious-bag-holder-missing-in-chalisgaon-one-injured-nrvb-376994.html”]
आपल्या चार दशकांच्या कारकिर्दीत भालचंद्र कुलकर्णी यांनी अनेक नाटके, दूरदर्शन मालिकांमध्ये भूमिका केल्या. १९६५ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकनाट्यातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी स्वतःला तमाशा या महाराष्ट्रातील पारंपारिक रंगभूमीचे उत्पादन म्हटले. कुलकर्णी यांनी सोंगाड्या, पिंजरा आणि इतर अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते. भालचंद्र कुलकर्णी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत सहाय्यक भूमिकेतून ठसा उमटवला.
गेल्या चार-पाच दशकांच्या कारकिर्दीत भालचंद्र कुलकर्णी यांनी असला नवरा नको गं बाई, पिंजरा, झुंज तुझी माझी, हळद रुसली कुंकू हसलं, थरथराट, जावयाची जात, धुमधडाका, सोंगाड्या, थरथराट अशा अनेक चित्रपटांत दमदार भूमिका साकारल्या. भालचंद्र कुलकर्णी हे त्यांच्या सहाय्यक भूमिकेसाठी ओळखले जातात.पण गेल्या अनेक वर्षांपासून ते अभिनय क्षेत्रापासून दूर होते. काही महिन्यांपूर्वी त्यांना ब्रँड कोल्हापूर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
[read_also content=”काश्मीर ते कन्याकुमारी जोडणारे नाशिक हे मध्यवर्ती स्थान आहे – नितीन गडकरी https://www.navarashtra.com/maharashtra/nashik-is-a-central-location-connecting-kashmir-to-kanyakumari-nitin-gadkari-nrvb-377088.html”]
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे ते काही वर्षे सचिव तर काही वर्षे संचालक होते. त्यांना महामंडळाच्या वतीने नुकताच चित्र भूषण पुरस्कार देण्यात आला होता. कुलकर्णी यांचे शनिवारी सकाळी ६ वाजता निधन झाले असून दुपारी १२ वाजता कोल्हापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.