Bharti Airtel चे विशेष अभियान! घराघरात पोहोचली 20 हजार कर्मचाऱ्यांची टीम, ग्राहकांच्या समस्या सोडवण्यावर दिला भर
भारतातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यापैकी एक अससलेल्या भारती एअरटेलने 12 मार्च रोजी ग्राहक दिन 2026 साजरा केला. यावेळी व्यापक मोहीम निश्चित करण्यात आली. ज्याचा उद्देश ग्राहकांच्या समस्या समजून घेणे आणि सेवा सुधारणे असा आहे.
ग्राहक दिन 2026 निमित्त सुमारे 20,000 कर्मचारी मैदानात उतरले. त्यांनी कार्यालयाबाहेर जाऊन ग्राहकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी घरांना आणि दुकानांना भेटी दिल्या.
ग्राहकांना नेटवर्क वापरताना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांच्यासमोर कोणती नवीन आव्हान आहेत, यासर्वांबाबत माहिती गोळा करून याचा अभ्यास करण्यात आला.
शाश्वत शर्मा, व्यवस्थापकीय संचालक आणि CEO, एअरटेल इंडिया, म्हणाले ग्राहकांचे म्हणणं ऐकून त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तात्काळ प्रयत्न करणं आवश्यक आहे.
एअरटेल थँक्स अॅप आणि एआय-ईनेबल टूल्सद्वारे ग्राहकांचा डिजीटल प्रवास अधिक सोपा व्हावा यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.