रक्तातील साखरेची पातळी कायमच राहील नियंत्रणात! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पेयांचे सेवन
रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
दालचिनीचा वापर मसाले बनवताना केला जातो. यासोबतच सकाळी उठून दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.
आवळ्यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आवळ्याच्या सेवनामुळे शरीरातील इन्सुलिन स्राव वाढतो. आवळा खाल्ल्यामुळे संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात.
वाढलेले वजन कमी करताना नियमित ग्रीन टी चे सेवन केले जाते. उपाशी पोटी ग्रीन टी प्यायल्यास रक्तातील साखर कमी होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील. यामध्ये असलेले पॉलीफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखर कमी करतात.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचा रस वरदान ठरतो. त्यामुळे आठवड्यातून दोनदा कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कारल्याचा रस प्यायल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.