कायमच हेल्दी आणि ठणठणीत राहण्यासाठी आहारात करा 'या' भारतीय पदार्थांचे नियमित सेवन
वेगवेगळ्या भाज्या आणि दलियाचा वापर करून बनवलेला उपमा चवीला आरोग्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहे. भारतीय लोक सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणात सुद्धा दलियाचें सेवन करतात.
जेवणाच्या डब्यात कायमच दिला जाणारा पदार्थ म्हणजे चपाती भाजी. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा इतर वेळी चपाती भाजी खाल्यास पोट जास्त वेळ भरलेले राहते.
बेसन चिला आणि ओल्या खोबऱ्याची चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. सकाळच्या नाश्त्यात अतिशय हलके पदार्थ खायचे असल्यास तुम्ही बेसन चिला किंवा मुगाच्या डाळीचे धिरडे बनवू शकता.
दक्षिण भारतात तांदूळ आणि उडीद डाळीपासून बनवली जाणारी इडली मोठ्या प्रमाणावर खाल्ली जाते. पौष्टिक पदार्थांच्या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर इडलीचे सेवन केले जाते.
तुपाची फोडणी आणि भरपूर भाज्यांचा वापर करून बनवलेली डाळ खिचडी चवीला अतिशय सुंदर लागते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं डाळ खिचडी खायला खूप जास्त आवडते.