भारतातील विवाहसोहळे केवळ एक संस्कार नसून भव्य उत्सवाचे स्वरूप धारण करत चालले आहे. अलीकडीच्या काळात डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड झपाट्याने वाढत चालला आहे. अनेक बॉलीवूड सेलिब्रेटिंनी या ट्रेंडला सुरूवात केली आहे. यामध्ये नवरा-नवरी त्यांचा खास दिवस एका विशिष्ट स्थळी, दूरच्या शहरात साजरा करतात. भारतातील प्रमुख शहरे जसे की उदयपूर, गोवा, जयपूर यांसारखी ठिकाणे लोकप्रिय आहेत. हा शहरे त्यांच्या सौंदर्याने आणि शाही भवितव्याने लोकांना आकर्षित करतात. पण सर्वांसाठीचे ते परवडणारे असतील असे नाही. अनेकदा बजेट नसल्याने लोक डेस्टिनेशन वेडिंग करायचा विचार टाळतात. मात्र आज आम्ही तुम्हाला काही भारतातील काही अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही कमी बजेटमध्ये तुमचा विवाहसोहळा करू शकता. (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पुष्कर, राजस्थान: शाही विवाहाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी पुष्कर एक उत्तम ठिकाण आहे. अरवली पर्वतरांगांनी वेढलेले हे ऐतिहासिक शहर आपल्या समृद्ध संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे असलेल्या पुरातन हवेल्या आणि राजवाड्यांमध्ये शाही विवाहाची अनुभूती तुम्हाला घेता येईल
अलिबाग, महाराष्ट्र: गोव्याच्या बजेटमध्ये विवाह शक्य नसल्यास, त्याच्या जवळच असलेले अलिबाग एक उत्तम पर्याय आहे. मुंबईपासून 2 तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण सुंदर समुद्रकिनारे आणि शहरी सोयी-सुविधांनी परिपूर्ण आहे. समुद्र किनारी स्वप्नवत लग्नासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे
मांडू, मध्य प्रदेश: भव्य किल्ले, राजवाडे आणि निसर्ग सौंदर्य असलेले मांडू हे ऐतिहासिक शहर डेस्टिनेशन वेडिंगसाठी चांगला पर्याय आहे
अलेप्पी, केरळ: रोमँटिक वातावरण आणि बॅकवॉटरसाठी ओळखले जाणारे अलेप्पी हे सुंदर ठिकाण आहे. हाऊसबोटीत विवाह सोहळा साजरा करण्याचा अनुभव खास असतो आणि नवदांपत्यांसाठी आयुष्यभर स्मरणीय राहील
जिम कॉर्बेट पार्क, उत्तराखंड: निसर्गाच्या सान्निध्यात शाही विवाह करायचा असल्यास, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क एक उत्तम निवड आहे. हिरवळ आणि शांत नद्या या ठिकाणाला मंत्रमुग्ध करतात