कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला की पहिले आठवतात ते कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रिम. सर्वात जास्त याचं सेवन उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा यासाठी होतो. मात्र याचं अतिसेवनाने आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात. म्हणूनच या उन्हाळ्यात कोल्ड ड्रिंक आणि आईस्क्रिम व्यतिरिक्त अशी काही पेय आहेत जे उन्हाळ्यात प्यायल्याने शरीराला कोणताही अपाय न होता फायदेतच होतील. कोणती आहेत ही पेय जाणून घेऊयात.

आवळा सरबत- पित्ताशामक आवळा सरबतामुळे पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवळ्याचा फायदा होतो. तसंच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील आवळा उपयुक्त आहे.

नारळाचं पाणी - शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचं काम नारळाचं पाणी करतं. नारळ पाण्यातील गुणधर्मामुळे मुत्रविकाराने आजार होत नाही. शरीरातील अतिक्त उष्णता कमी करण्याचं काम नारळाचं पाणी करतं.

भाताची पेज - कोकणात सर्वात जास्त काय पिकतं तर ते म्हणजे भात. याच उकड्या भाताची पेज उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून शरीराला वाचवते. उन्हामुळे अशक्तपणा आल्यास उकड्या भाताच्या पेजेमुळे शरीराला ताजेतवाने वाटते.

कोकम सरबत - पित्तावर गुणकारी असं रामबाण औषध म्हणजे कोकम सरबत. बाहेरच्या चमचमीत खाण्याने अनेकदा उन्हाळ्यात पोट बिघडतं पण कोकम सरबत किंवा सोलकढी प्यायल्याने पचनाचा त्रास कमी होतो.

लिंबू सरबत- उन्हाळ्यात लिंबू सरबत म्हणजे वरदानच आहे. चक्कर येणं किंवा अशक्तपणा वाटत असेल तर लिंबू सरबत फायदेशीर ठरतं. लिंबूमधील विटामीन सीमुळे अपचानाचा त्रास देखील कमी होतो.






