आवळा सरबत- पित्ताशामक आवळा सरबतामुळे पचनक्रिया सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आवळ्याचा फायदा होतो. तसंच रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी देखील आवळा उपयुक्त आहे.
नारळाचं पाणी - शरीराला नैसर्गिक थंडावा देण्याचं काम नारळाचं पाणी करतं. नारळ पाण्यातील गुणधर्मामुळे मुत्रविकाराने आजार होत नाही. शरीरातील अतिक्त उष्णता कमी करण्याचं काम नारळाचं पाणी करतं.
भाताची पेज - कोकणात सर्वात जास्त काय पिकतं तर ते म्हणजे भात. याच उकड्या भाताची पेज उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून शरीराला वाचवते. उन्हामुळे अशक्तपणा आल्यास उकड्या भाताच्या पेजेमुळे शरीराला ताजेतवाने वाटते.
कोकम सरबत - पित्तावर गुणकारी असं रामबाण औषध म्हणजे कोकम सरबत. बाहेरच्या चमचमीत खाण्याने अनेकदा उन्हाळ्यात पोट बिघडतं पण कोकम सरबत किंवा सोलकढी प्यायल्याने पचनाचा त्रास कमी होतो.
लिंबू सरबत- उन्हाळ्यात लिंबू सरबत म्हणजे वरदानच आहे. चक्कर येणं किंवा अशक्तपणा वाटत असेल तर लिंबू सरबत फायदेशीर ठरतं. लिंबूमधील विटामीन सीमुळे अपचानाचा त्रास देखील कमी होतो.