तीन लग्न, 50 पेक्षा जास्त महिला, जजलाही अडकवलं; दहावी नापास अय्यूबचा 'असा' आहे धक्कादायक पराक्रम
भारतातील ईशान्येकडील मेघालय राज्यात लग्नानंतर मुली सासरी न जाता मुलांना सासरी जावे लागते
मेघालयातील खासी जमातीमध्ये लग्नाबाबत ही वेगळी प्रथा आहे. इथे वंश वडिल नाही तर आई चालवते. म्हणजे कुटुंब मातृवंशीय पद्धतीने चालवले जाते
या ठिकाणी घरगुती मालमत्ता आईकडून मुलीकडे हस्तांतरित केली जाते
मुलगी आणि तिची मुले लग्नानंतर आईचे आडनाव लावतात. तर नवरा आपल्या सासरच्या घरी राहतो
या समाजात महिलांना पूर्ण सन्मान दिला जातो आणि त्यांना पुरुषांपेक्षा जास्त अधिकार मिळतात
मेघालयमध्ये एकाच गोत्रातील दोन व्यक्तींच्या विवाहाला परवानगी नाही. त्याच्या लग्नांमध्ये काही मनोरंजक प्रथा आणि परंपरा आहेत ज्यात मुली मुलांना प्रपोज करतात
तरुण पुरुष आणि महिलांना त्यांचे जीवन साथीदार निवडण्यामध्ये स्वातंत्र्य दिले जाते. जे लोक लग्न करणार आहेत ते लग्नाच्या आधीच एकमेकांना चांगले ओळखतात
मेघालयात पारंपारिक विवाह खूप गुंतागुंतीचे असतात. या राज्यात मुला-मुलींचे लग्न तेव्हाच होतात जेव्हा दोन्ही कुटुंबे संमती देतात. हा समारंभ वधूच्या घरी होतो आणि जोडपे एकमेकांना अंगठी देतात
मेघालयातील खासी जमातीत हुंडा प्रथेला बंदी आहे. यांची लग्नसमारंभातील पेहरावाची शैली देखील अनोखी असते. स्त्रिया पारंपारिक दागिने घालतात, वधूच्या पोशाखाला स्थानिक भाषेत धारा म्हणतात