लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रताळी खायला खूप आवडतात. आरोग्याच्या दृष्टीने रताळी ही अतिशय पौष्टिक भाजी आहे. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. रताळं खाल्यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. मधुमेह झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र असे न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करत आहारात बदल करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रताळं खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारात नियमित करा रताळ्याचे सेवन
गोड रताळ्यांमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात आढळून येते. या विटामिनचे रूपांतर नंतर विटामिन ए मध्ये होते. विटामिन ए शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते, त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी रोजच्या आहारात रताळ खावं. यामुळे पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आहारात रताळ्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होईल.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात रताळी खावी. रताळं खाल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. सकाळच्या नाश्त्यात रताळी खाल्यास वजन नियंत्रणात राहते.
रताळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी मदत करतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित रताळी खावी.