हिंदू धर्मात तुळशीच्या झाडाला विशेष महत्व आहे. तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक कार्यक्रमांसाठी केला जातो. पूजा किंवा इतर अनेक गोष्टी करताना तुळशीची पाने लागतात. त्यामुळे घराच्या अंगणात तुळशीचे एकतरी रोप लावावे. यामुळे केवळ शारीरिक आरोग्यालाच नाहीतर मानसिक आरोग्याला सुद्धा अनेक फायदे होतात. घरातील हवा कायमच खेळती राहते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला घरात तुळशीचे रोप लावल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या तुळशीचे शरीराला होतात भरमसाट फायदे! घरातील हवा कायमच राहील खेळती

तुळशीची पाने नॅचरल एअर प्यूरीफायर म्हणून काम करतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे हवेतील हानिकारक बॅक्टेरिया आणि टॉक्सिन्स बाहेर पडून जातात.

तुळस लावल्यामुळे मानसिक शांतता कायम टिकून राहते. यामध्ये असलेली गुणकारी तत्व शरीरासाठी अतिशय प्रभावी ठरतात. मन शांत राहते, झोपेची गुणवत्ता सुधारते इत्यादी अनेक फायदे होतात.

सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी तुळशीच्या पानांचा चहा बनवून प्यावा. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहते आणि आरोग्य सुधारते.

तुळशीमध्ये असलेल्या तत्त्वांमुळे डासांपासून शरीराचा बचाव होतो. त्यामुळे घरात एक तरी तुळशीचे रोप लावावे. यासाठी तुम्ही तुळशीच्या पानांचा वापर करून स्प्रे सुद्धा बनवू शकता.

धार्मिक दृष्ट्या घरात तुळशीचे रोप लावणे अतिशय फायद्याचे मानले जाते. यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम शरीरावर लगेच दिसून येत नाही.






