Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vande Mataram: वंदे मातरम् वरुन पेटला वाद!अबू आझमींवर भाजप नेते भडकले; म्हणाले, पाकिस्तानात चालते व्हा…’

वंदे मातरम पूर्ण गीत म्हणण्याचे महाराष्ट्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. याला मात्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी विरोध दर्शवला.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 30, 2025 | 05:39 PM
Abu Azmi criticizes for making Vande Mataram compulsory in Maharashtra schools BJP leaders angry

Abu Azmi criticizes for making Vande Mataram compulsory in Maharashtra schools BJP leaders angry

Follow Us
Close
Follow Us:

Vande Mataram in school: मुंबई: राष्ट्रीय गीत असलेल्या वंदे मातरमवरुन वाद निर्माण झाला आहे. वंदे मातरम् या गीताला 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये वंदे मातरम पूर्ण स्वरूपात म्हणण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन मात्र आता वाद निर्माण झाला आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गाण्याचे आत्तापर्यंत केवळ दोन कडवे गायली जात होती. मात्र यापुढे पूर्ण गीत म्हणण्याचे महाराष्ट्र सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे. याला मात्र समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांनी विरोध दर्शवला. यावरुन राजकीय वाद निर्माण झाला आहे.

३१ ऑक्टोबर २०२५ (कार्तिक शुद्धी नवमी) रोजी या गाण्याच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम गाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतवा आहे. मात्र यावर समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार अबू आझमी मुद्यावरून आक्षेप घेतला आहे. “वंदे मातरम बंधनकारक करणं योग्य नाही” असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी घेतलेल्या या या भूमिकेनंतर भाजप नेत्यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. मंगलप्रभात लोढा तसेच नवनाथ बन यांनी आझमींवर जोरदार निशाणा साधला आहे. भारत माता, आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावे, अबू अजमी यांनी देश सोडून जावेव,पाकिस्तानात जावं अशी जहरी टीका त्यांच्यावर करण्यात आली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी तर अबू आझमींवर टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, “अबू आझमींना कळलं पाहिजे हा पाकिस्तान नाही, तर भारत आहे . नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा भारत आहे, देवेंद्रजींचा महाराष्ट्र आहे. भारत मे रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा. अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

अबू आझमी यांच्या मतदारसंघातील लोकांना आवाहन आहे त्यांच्या घरी जा आणि वंदे मातरम दिन आमच्यासोबत साजरा करा. वंदे मातरम स्वतंत्र्याचे गीत होते, मंत्र होता, आज पण याचे उच्चारण होते. या गीताला 150 वर्षं पूर्ण होत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठा कार्यक्रम साजरा करणार आहोत. कोणाची हिंमत असेल तर समोर यावं, नाहीतर आमचे कार्यकर्ते तुमच्या घरासमोर येत वंदे मातरमचे गायन करतील असा इशाराही मंगलप्रभात लोढा यांनी अबू आझमी यांना दिला.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या वादावर भाजपचे माध्यमप्रमुख नवनाथ बन यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारतात राहयचं असेल तर वंदे मातरम्, भारत माता की जय म्हणाव लागेल. भारत माता, आणि वंदे भारतची ॲलर्जी असेल तर त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन राहावे.वेदांपेक्षा आम्हाल वंदे मातरम् प्रिय आहे. अबू अजमी यांना द्वेष असेल तर त्यांनी देश सोडून जावा, अशा शब्दांत अबू आझमी यांच्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे.

Web Title: Abu azmi criticizes for making vande mataram compulsory in maharashtra schools bjp leaders angry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 05:39 PM

Topics:  

  • Abu Azmi
  • Maharashtra Politics
  • vande mataram

संबंधित बातम्या

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?
1

Kolhapur News : निवडणुकीत गाजणार हद्दवाढीचा विषय ; कोल्हापूर शहरातील रस्त्यांचा दर्जा ठरणार वादाचं कारण ?

Political News : पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या प्रवेशामुळे संघटनात्मक पातळीवर मिळणार बळ
2

Political News : पुण्यात सुरेंद्र पठारेंच्या प्रवेशामुळे संघटनात्मक पातळीवर मिळणार बळ

‘भाजपला कधी मिळाले नाही तेवढं यश नगरपरिषद निवडणुकीत मिळणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास
3

‘भाजपला कधी मिळाले नाही तेवढं यश नगरपरिषद निवडणुकीत मिळणार’; चंद्रशेखर बावनकुळेंचा विश्वास

‘टीम देवेंद्र’मध्ये सुरेंद्र पठारेंची एंट्री; पुण्यात भाजपची ताकद वाढली
4

‘टीम देवेंद्र’मध्ये सुरेंद्र पठारेंची एंट्री; पुण्यात भाजपची ताकद वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.