
Buldhana, Sangrampur, Crime News, Maharashtra Politics,
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक उगले यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक व्हिडिओ तयार केला असून, त्यामध्ये राजकीय विरोधकांकडून होत असलेल्या कथित त्रास आणि धमक्यांना कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे.
दीपक उगले यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या शेतात हा व्हिडिओ शूट केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी वैभव पाटील उर्फ भैया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “वैभव पाटील उर्फ भैया याच्या जाचाला कंटाळून मी माझं आयुष्य संपवत आहे,” असे उगले यांनी व्हिडिओमध्ये म्हटल्याचे समोर आले आहे.
“गेल्या तीन वर्षांपासून वैभव पाटील हे आपल्यावर सरपंचपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणत आहेत. तू राजीनामा दे, मला सरपंच व्हायचं आहे,” असे सांगून आपल्याला वारंवार त्रास दिला जातोय, असं सरपंच दिपक उगले असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.
इतकेच नव्हे तर, राजीनामा न दिल्यास आपल्यासह कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. फोनवरून आणि प्रत्यक्ष भेटूनही आपल्याला त्रास दिला जात जातोय. वैभव पाटील यांच्या सततच्या या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये नमूद केले आहे.
दीपक उगले यांच्या आत्महत्येनंतर दीपक उगले हे करमोडा गावचे लोकनियुक्त सरपंच होते. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, व्हिडिओमध्ये करण्यात आलेल्या आरोपांची तसेच आत्महत्येमागील नेमक्या कारणांची चौकशी केली जात आहे.