
Bachchu Kadu, Maharashtra Government grants Farmers Loan waver, Maharashtra Government, Farmers Loan waver
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेत राज्य सरकारने घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत शेतकरी कर्जमाफीबाबतीत शिक्कामोर्तब करण्यात आले असून २ लाक रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे. राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैंठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र आगामी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सुरु असल्याने याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. असे असतानाच शिवसेना नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी याबाबत सरकारचे आभार मानले असून एका विशिष्ट मागणीसाठी आंदोलनाचा लढा कायम ठेवणार असल्याचे म्हंटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कॅबिनेट मिटिंग घेण्यात आली. त्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून सहकार विभागाकडून अटी व शर्तीनंतर कर्जमाफी केली जाईल. मात्र राज्यात आगामी विधान परिषद निवडणुकांमुळे लागलेल्या आचारसहिंतेमुळे या निर्णयाची अद्याप घोषणा करण्यात आली नाही. या निर्णयानंतर दोन लाख रुपयांच्या मर्यादेत अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेवर आज कॅबिनेट बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत पीक कर्ज माफी देण्यात येईल. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना २ लाकडं रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. नियमित कर्ज फेड करणाऱ्या उमेदवारांना राज्य सरकार कडून प्रोत्सहन देण्यात येईल. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे अनुदान राज्य सरकार देणार आहे. म्हणजेच त्यांचे अतिकरिक्त ५० हजार रुपयांचे कर्ज माफ होईल.
सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले, “आज कर्जमाफीचा निर्णय झाला त्याबद्दल मी देवभाऊ आणि खास करून अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. जो जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी झाला होता, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली. परंतु, प्रोत्साहनपर निधी ५० हजार आहे तो एक लाख करावा यासाठी बच्चू कडूचा लढा कायम राहील. हि कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत येईल आणि त्यांच्या घराचं आयुष्य बदलणारी राहील अशी आशा करतो. केवळ कर्जमाफी करून चालणार नाही तर हमीभावाच्या लढाईतसुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही,” असे ते यावेळी म्हणाले.
राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांमुळे आचारसंहिता चालू आहे. हि आचारसंहिता संपल्यावर राज्यात हि कर्जमाफी लागू केली जाणार आहे. कॅबिनेट बैठकीत या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली असली तरी अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही. या निर्णयाद्वारे ६५ लाखांवर कर्जखात्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे थेट ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत २४ हजार कोटींचा भ्रष्टाचार? वर्षा गायकवाड यांचे गंभीर आरोप