
Sugar Quota Policy, Maharashtra Sugar Industry,
नियमित विक्री करावी लागल्याने कारखान्यांच्या साठ्यावर आणि रोख प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. बाजारात पुरवठा वाढल्यास साखरेचे दर आणखी नरमण्याची शक्यता आहे. साखरेच्या दरात मोठी घसरण झाल्यास कारखान्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊन त्याचा अप्रत्यक्ष परिणाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या देयकांवर होऊ शकतो. मात्र, ग्राहकांच्या दृष्टीने बाजारात साखरेची उपलब्धता वाढल्याने किरकोळ दरात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पंधरवड्याचा कोटा लागू झाल्यास साखरेची विक्री आणि उपलब्धतेवर केंद्राचे लक्ष राहणार आहे. सणासुदीच्या काळात पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
पंधरवड्याच्या कोट्यामुळे साखरेचा पुरवठा नियमित झाला आणि बाजारातील मागणी स्थिर राहिली, तर अहिल्यानगर जिल्ह्यात कारखाना/घाऊक पातळीवरील साखरेचे दर साधारण ४८ ते ५५ रुपये प्रति किलो राहण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात वाहतूक, व्यापारी मार्जिन, साखरेचा प्रकार आणि बँडनुसार दर साधारण ५५ ते ६५ रुपये प्रति किलो राहू शकतो.
पुरवठा नियमित राहण्यास मदत होईल. कारखान्यांनी शासनाने निश्चित केलेल्या कोट्यानुसार साखरेची विक्री करणे अपेक्षित आहे. बाजारात अचानक मोठ्या प्रमाणात साखर येऊन दरावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी नियोजन आवश्यक आहे. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास पुरवठा सुरळीत ठेवण्यास या पद्धतीचा फायदा होऊ शकतो.
डॉ. केदारी जाधव, साखर संचालक (प्रशासन)
Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये