
Chandrashekhar Bawankule slams Harshvardhan Sakpal over statement against PM Narendra Modi, Chandrashekhar Bawankule slams Harshvardhan Sakpal, Harshvardhan Sakpal over statement against PM Narendra Modi,
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीच्या (MSP) मागणीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे, शेतकऱ्यांनी महामार्ग रोखून धरत आपल्या प्रमुख मागण्या लावून धरल्या. या आंदोलनाला बळ देण्यासाठी घटनास्थळी दाखल झालेले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यासपीठावरून बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्देशाने अत्यंत आक्रमक आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून त्यावर विविध सत्ताधारी नेत्यांच्या प्रतिक्रिया याया सुरुवात झाली आहे. अश्यातच आता भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हर्षवर्धन सकपाळ यांना प्रत्युत्तर देत “काँग्रेसचे कर्तृत्वशून्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या दिल्लीतल्या नाकर्त्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याविषयी वापरलेली घाणेरडी भाषा ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळीमा फासणारी आहे,” असे म्हंटले आहे.
हर्षवर्धन सकपाळ यांच्या पंतप्रधान मोदींवरील टीकेने आता राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आता पुन्हा एकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि टीका टिपण्ण्याच्या फैरी झाडलेल्या पाहायला मिळणार आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ‘X’ अकाऊंटवरून हर्षवर्धन सकपाळांना लक्ष्य केले. ते यावेळी म्हणाले, “काँग्रेसचे कर्तृत्वशून्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या दिल्लीतल्या नाकर्त्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांच्याविषयी वापरलेली घाणेरडी भाषा ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकीय परंपरेला काळीमा फासणारी आहे. ही व्यक्ती एखादा सामान्य कार्यकर्ता असता तर कदाचित कोणी दखलही घेतली नसती. पण दुर्दैवाने ते आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वावरत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यातून काँग्रेसची विकृत आणि गलिच्छ राजकीय संस्कृती पुन्हा एकदा समोर आली आहे. राहुल गांधींपासून काँग्रेसच्या अनेक नेत्यांपर्यंत विरोधकांवर व्यक्तिगत पातळीवर घसरून बोलण्याची हीच परंपरा दिसते.”
काँग्रेसचे कर्तृत्वशून्य प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या दिल्लीतल्या नाकर्त्या नेतृत्वाला खुश करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय @narendramodi जी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्याविषयी वापरलेली घाणेरडी भाषा ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृत… — Chandrashekhar Bawankule (@cbawankule) May 26, 2026
“कितनी आसानी से मशहूर किया है ख़ुद को,
मैंने अपने से बड़े शख़्स को गाली दे कर…”
“नेमकी हीच या प्रसिद्धीलोलूप हर्षवर्धन सकपाळ यांची अवस्था आहे. ज्यांना स्वतःच्या मतदारसंघातील जनता विचारत नाही, ते देशाच्या सर्वाधिक लोकप्रिय नेतृत्वावर बोलून मथळे मिळवू पाहतात, हीच त्यांची राजकीय उंची आहे. महाराष्ट्राची जनता सुसंस्कृत आहे, सजग आहे आणि अशा घाणेरड्या, विकृत मानसिकतेच्या राजकारणाला कधीही स्वीकारणार नाही, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. सपकाळ यांच्या वक्तव्याचा मी आणि आमचा पक्ष निषेध करीत आहे,” असे ते यावेळी म्हणाले.
आपल्या भाषणांदरम्यान हर्षवर्धन सकपाळ यांनी पंतप्रधान मोदींवर अर्वाच्य भाषेत टीका केली. ते म्हणाले,” आजपर्यंत आपण नमक*** हा शब्द ऐकला होता पण मोदी कांदा*** निघाला. मी तुमचा कांदा खाल्लाय मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही असे तो म्हणाला होता. आता बघा किती बेईमानी केली.” मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करताना ते म्हणाले,”हे नालायक सरकार आहे. फडणवीस म्हणाले कांद्याला २४०० दर देऊ पण हा गद्दार माणूस आहे कि उलटी उडी मारत आता १२०० रुपयांचं बोलत आहे. अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे.”