
Congress social media post target parth pawar over baramati by election 2026
बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये शरद पवार गटाने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. घरातील व्यक्ती वारल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. मात्र महाविकास आघाडीकडून त्यांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. बारामतीच्या रिंगणात उमेदवार न देण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केला होता. मात्र तरी देखील काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर केल्याने पार्थ पवार यांनी रोष व्यक्त केला होता. या निर्णयामुळेच काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रमध्ये दयनीय अवस्था झाली असल्याची टीका पार्थ पवारांनी केली होती. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसच्या ऑफिशयल अकाऊंटवरुन पार्थ पवारांवर निशाणा साधला.
हे देखील वाचा : राष्ट्रवादीत जय पवारांची मोठी एन्ट्री! अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची मास्टरस्ट्रोक रणनीती
एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काँग्रेस महाराष्ट्राने प्रत्युत्तर दिले आहे. यामध्ये लिहिले आहे की, “धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने कॉंग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील,” अशी घणाघाती टीका पार्थ पवारांवर करण्यात आली.
धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने कॉंग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं ? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत… — Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 6, 2026
हे देखील वाचा : “…म्हणून काँग्रेसची महाराष्ट्रात दयनीय अवस्था; बारामती पोटनिवडणुकीवरुन पार्थ पवारांनी साधला निशाणा
पुढे लिहिले की, “तसेच या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकार ने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, कॉंग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणूकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईल, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?” असा प्रश्न महाराष्ट्र काँग्रेसने उपस्थित केला आहे.