Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चोरी…; राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचा पलटवार

वाढीव मतदानाच्या मुद्द्यावरही भाजपाने स्पष्टीकरण दिले. दिवसभरात प्रतितास सरासरी मतदान 5.83% होते, तर शेवटच्या तासात 7.83% इतकी वाढ झाली. 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 5 वाजता 60.96% मतदान झाले होते

  • By anuradha sagar
Updated On: Jun 08, 2025 | 10:49 AM
Devendra Fadnavis News: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत चोरी…; राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचा पलटवार
Follow Us
Follow Us:

Devendra Fadnavis On Rahul Gandhi: गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ या लोकशाही यंत्रणेत फेरफार करण्यासाठी मॅच फिक्सिंगचा आराखडा तयार करण्यात आला होता. आता हाच प्रकार बिहार निवडणुकीतही होणार आहे. भारतीय जनता पक्षाला जिथे जिथे हार पत्करावी लागते तिथे अशा प्रकारची गैरकृत्ये केली जातात, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीकेचा आसूड ओढला आहे. राहुल गांधी यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत, ‘ मॅच फिक्सिंग महाराष्ट्र’ असा लेख लिहीला आहे. तसेच, त्यांच्या ट्विटर एक्सवरही हा लेख शेअर केला आहे. या लेखात त्यांनी महाराष्ट्र सरकावर गंभीर आरोप केले आहेत. या लेखानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील राहुल गांधी यांच्या टीकेला लेखाने उत्तर दिले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २०२४ मध्ये मतदानाच्या दिवशी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२ टक्के मतदान झाले होते. पण त्यानंतरही ही आकडेवाडी वाढत गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी मतदानाची अंतिम टक्केवारी 66.05 टक्के असल्याचे सांगण्यात आले. म्हणजेच एकूण मतदानाच्या आकडेवारीत ७.८३ टक्क्यांची वाढ झाली. राज्यातील केवळ १२ हजार मतदान केंद्रांवर अचानक नव्या मतदारांची भर पडली. त्यातील ८३ मतदारसंघात भाजपचा विजय झाला, असा दावा राहुल गांधींनी केला.

Thackeray-MNS Alliance: राज-उद्धव एकत्र यावे, हे शिवसैनिकांचे स्वप्न : शिवसेनेच्या बड्या नेत्याचे विधान

राहूल गांधी यांच्या या दाव्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देताना म्हटलं आहे की, शेवटच्या तासांत झालेल्या मतदानामुळे एनडीएचा विजय झाला, म्हणणे हास्यास्पद आहे. कामठी मतदार संघाचे उदाहरण मी इथे देत आहे, “माढा मतदासंघात शेवटच्या तासांत १८ टक्के मतदान झाले. पण तिथे शरद पवार गटाचा उमेदवाराचा विजय झाला. वणीमध्ये शेवटच्या तासात 13 टक्के मतदान झाले, तिथे ठाकरे गटाचा उमेदवाराचा विजय झाला. श्रीरामपूरमध्ये 12 टक्के मतदान झाले, त्याठिकाणीही काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला, असं देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले.
आगामी बिहारसह इतर राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकणाऱ्या संभाव्य पराभवासाठी काँग्रेसने आतापासूनच कारणे शोधायला सुरुवात केली आहे, असा घणाघात भाजपाने केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीपासून ते मतदार वाढ आणि मतदान टक्केवारीवरून काँग्रेसने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपाकडून परखड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून काँग्रेसवर टीका

1950 पासून नवीन कायदा लागू होईपर्यंत 26 पैकी 25 मुख्य निवडणूक आयुक्तांची थेट नियुक्ती काँग्रेस सरकारने केली होती, हे लक्षात घेण्यासारखे आहे. मोदी सरकारने प्रथमच विरोधी पक्षनेता असलेली समिती नियुक्त करून पारदर्शकता आणली. मात्र काँग्रेसला हा लोकशाहीस बळकट करणारा बदल मान्य नाही, अशी टीका करण्यात आली.

कडुलिंब आणि वाटीभर तुपाचा वापर करून १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा औषधी काजळ, डोळ्यांना मिळेल थंडावा

मतदार वाढ व आकडेवारीबाबत स्पष्टीकरण

2024 च्या निवडणुकांमध्ये 40.81 लाख मतदारांपैकी 26.46 लाख युवा मतदार होते. नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत काँग्रेसच्या शंकांचे निरसन करणारे 60 पानी स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने 24 डिसेंबर 2024 रोजी सादर केले होते. याआधीच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणावर मतदार वाढ झाली होती:

2004-2009 : 1 कोटी नवीन मतदार

2009-2014 : 75 लाख

2014-2019 : 63 लाख

2024 मध्ये काही ‘दिव्य’ घडले असल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मतदान टक्केवारीबाबत भाजपाची भूमिका

वाढीव मतदानाच्या मुद्द्यावरही भाजपाने स्पष्टीकरण दिले. दिवसभरात प्रतितास सरासरी मतदान 5.83% होते, तर शेवटच्या तासात 7.83% इतकी वाढ झाली. 2024 च्या दुसऱ्या टप्प्यात 5 वाजता 60.96% मतदान झाले होते, जे पुढे 66.71% वर पोहोचले. यातील 5.75% वाढ ही नैसर्गिक असून, पूर्वीही अशीच नोंद झाली आहे. राहुल गांधी यांनी केवळ एनडीए जिंकलेल्या जागांवर शेवटच्या टप्प्यात मतदान वाढल्याचा आरोप केला. मात्र, माढा (18% वाढ – शरद पवार गट विजयी), वणी (13% वाढ – ठाकरे गट विजयी), श्रीरामपूर (12% वाढ – काँग्रेस विजयी) ही उदाहरणे समोर ठेवत भाजपाने हा दावा खोडून काढला.

राहुल गांधींवर वैयक्तिक आणि राजकीय टीका

भाजपाने राहुल गांधी यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय टीका करताना म्हटले, की लोकशाही आणि जनादेशाचा सतत अपमान हा काँग्रेसच्या अधोगतीचे कारण ठरत आहे. स्वतःच्या पराभवाचा बदला जनता आणि देशाच्या संस्थांवर टीका करून घेण्याचा प्रयत्न होत आहे. राहुल गांधी यांना त्यांच्याच पक्षाचे आमदार एक दिवसात भेटत नाहीत, यावरही त्यांनी आत्मचिंतन करावे, अशी टीका करण्यात आली. भाजपाने स्पष्टपणे सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकरी, महिला व सामान्य जनतेने दिलेल्या कौलाचा असा अपमान केल्यास महाराष्ट्राची जनता काँग्रेसला माफ करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने, महाराष्ट्राच्या जनतेच्या अपमानाचा तीव्र निषेध करण्यात आला.

Web Title: Devendra fadnavis response to rahul gandhis criticism on maharashtra assembly elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2025 | 10:49 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • NDA
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश
1

Rahul Gandhi Independence Day 2026: स्वातंत्र्य ही केवळ भेट नसून मोठी जबाबदारी; स्वातंत्र्यदिनानिमित्त राहुल गांधींचा खास संदेश

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
2

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द
3

Rahul Gandhi Defamation Case: राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा!; स्वातंत्र्यवीर सावरकर मानहानी प्रकरण रद्द

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
4

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.