
४० गट एकत्र आले तर महाराष्ट्रात सत्ता बहुजनांचीच येईल : उपमहापौर परशुराम वाडेकर
पुणे : रिपब्लिकन पक्षातच गटबाजी आहे असे नाही. आज आपण प्रत्येक पक्षात गटबाजी असलेले पाहतो, सकाळी येथे तर संध्याकाळी दुसऱ्या पक्षात अशी स्थितीत प्रत्येक पक्षात पाहायला मिळते, कोणाचीही आपल्या पक्षावर निष्ठा राहिलेली नाही, जो तो आपआपला स्वार्थ बघतो, गटबाजी बाबासाहेब आंबेडकर यांना पण सुटलेली नाही. रिपब्लिकन पक्षाचे 40 गट एकत्र आले तर राज्यात, देशात बहुजनांचीच सत्ता येईल, असे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी म्हटले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवंत असताना ही गटबाजी संपलेली नव्हती. तेव्हापासून आजपर्यंत गटबाजी सुरुच आहे. गटबाजी संपणार आहे की नाही हे कुठवर चालणार? पक्षातील गटबाजी संपली पाहिजे, गटबाजी ही पक्षासाठी घातक आहे. रिपब्लिकन पक्षाचे ४० गट एकत्र आले तर राज्यात, देशात बहुजनांचीच सत्ता येईल, रिपाइंचे चार गट एकत्र आले तेव्हा चार खासदार निवडून आले होते.
गटबाजी संपवा सर्वजण पक्षासाठी, नेते रामदास आठवले यांच्यासाठी एकत्र या शहरात रिपब्लिकन पक्ष एकच असला पाहिजे. दोन गट नकोत, पुणे शहरात रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. येथील रिपाइं कार्यकर्त्यांच्या जोरावर आठवले साहेब आज तिसऱ्यांदा राज्यसभेवर गेलेत, ही पक्षाची ताकद आहे, असे उपमहापौर व रिपाइं महाराष्ट्र राज्य संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी पक्ष कार्यालयात रिपब्लिकन पक्षाची बैठक व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, रिपाइं पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे, नगरसेवक निलेश आल्हाट, नगरसेविका निशा मानवतकर, मोहन जगताप, सरचिटणीस महिपाल वाघमारे रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने यावेळी मुस्लिम बांधवांसाठी रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन, तसेच स्नेहभोजन, नवीन कार्यकर्त्यांना पदाचे वाटप, नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार असे विविध कार्यक्रम रिपाइं पुणे शहर अध्यक्ष संजय सोनवणे यांनी आयोजित केले होते.
हेदेखील वाचा : Satara Politics : सातारा जिल्हा परिषदेत सत्तेची ‘गुढी’ उभारणार कोण? अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग