
Jayant Patil Sangli Press Meet 2026, Ajit Pawar Plane Crash Mystery,
सांगली येथे माध्यमांशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी संबंधित प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले, “आमदार रोहित पवार यांनी अजितदादांच्या मृत्यूबाबत काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांनी केलेल्या निरीक्षणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. या प्रकरणात सत्य समोर यावे, ही सर्वांची अपेक्षा आहे.”
पाटील म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूबाबत शंका निर्माण होत असतील तर शासनाने तातडीने सखोल चौकशी करणे आवश्यक आहे.ही केवळ राजकीय बाब नाही, तर न्याय आणि पारदर्शकतेचा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणांनी दबावमुक्त वातावरणात तपास करावा,” असे त्यांनी नमूद केले.
चौकशी प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “चौकशी झालीच पाहिजे; मात्र ती निष्पक्षपणे आणि पारदर्शकतेने होईल का, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. या शंका दूर करण्याची जबाबदारी शासनाची आहे.” या प्रकरणी सर्व संबंधित कागदपत्रे, घटनाक्रम आणि साक्षीदारांची माहिती तपासून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्य बाहेर येणे हेच लोकशाहीसाठी हितावह असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले असून संबंधित प्रकरणाच्या चौकशीबाबत पुढील भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Rohit Pawar PC: पायलटचा वापर करून अजित पवारांच्या विमानाचा
रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत विमान अपघात तपास ब्युरोचा अहवाल आल्यानंतरही अनेक शंका उपस्थित होत आहे. या अहवालानुसार विमानाच्या ब्लॅक बॉक्सचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावरून रोहित पवार यांनी पुन्हा एकदा VSR विमान कंपनीच्या कारभार आणि तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.याचवेळी त्यांनी व्हीएसआर कंपनीला वाचवण्यचा कोण प्रयत्न करतय, अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, काही लोक यात मैत्री आणि राजकारण आणण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीत मोठे गुंतवणूकदार आहेत. त्यात मी जाणार नाही. पण कंपनीत शेकडो कोटींची गुंतवणूक असल्यामुळे कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. १००-१५० कोटींसाठी कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करू नका, अशी माझी गुंतवणूक दारांना विनंती आहे. नाहीतर आम्ही शांत बसणार नाही, आमचा काका गेलाय, असा इशारा रोहित पवारांनी यावेळी दिला.