
Major Relief for Those MPs Who Joined the BJP
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांच्यासह सात खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाकडून आता महत्त्वपूर्ण पावले उचलली जात होती. खासदार संजय सिंह यांनी राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांना पत्र पाठवून नुकतेच ‘आप’ सोडून भाजपमध्ये सहभागी झालेल्या सात खासदारांना अपात्र ठरवण्याची विनंती केली. मात्र, ही विनंती अमान्य करण्यात आली आहे.
संजय सिंह यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले, या सात राज्यसभा सदस्यांची ही कृती पक्षांतर असून, संबंधित कायद्यातील तरतुदींच्या विरोधात आहे. हे खासदार ‘आप’च्या तिकिटावर राज्यसभेवर निवडून आले होते. मात्र, नंतर त्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राघव चड्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठक, हरभजन सिंग, राजेंद्र गुप्ता, साहनी, स्वाती मालीवाल यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने ‘आप’ला धक्का बसला. त्यामुळेच संजय सिंह यांनी या सातही खासदारांचे सदस्यत्त्व रद्द करण्याची विनंती केली होती. मात्र, संजय सिंह यांची ही विनंती राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी अमान्य केली.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आपल्या तत्त्वांपासून आणि नैतिक मूल्यांपासून भरकटला आहे. संजय सिंग यांनी असा आरोप केला की, असे पक्षांतर हे जनतेच्या जनादेशाचा, विशेषतः पंजाबमधील, विश्वासघात असून ते संविधानाच्या भावनेच्या विरोधात आहे. पक्ष सोडलेल्या सात खासदारांपैकी सहा पंजाबमधील राज्यसभा सदस्य आहेत. ‘आप’ने याप्रकरणी ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि माजी लोकसभा महासचिव यांच्यासह घटनातज्ञांशी सल्लामसलत केली आहे. हे खासदार कायद्यानुसार अपात्र अपात्र ठरू शकतात, असे म्हटले जात होते. मात्र, हा निर्णय या खासदारांच्या बाजूने लागल्याने आता आम आदमी पक्षाला आणखी एक धक्का बसल्याचे सांगण्यात येत आहे.
Political News : हरभजन सिंगचा BJPमध्ये प्रवेश अन् AAP चा मोठा दणका; पंजाब सरकारने हटवली Z+ सुरक्षा