आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे हरभजनसिंग यांची z पल्स सुरक्षा पंजाब सरकारने काढून घेतली (फोटो - सोशल मीडिया)
AAP Politics : चंदीगड : ऑपरेशन लोटसने आम आदमी पक्षाचा सुफडा साफ केला आहे. 10 पैकीं सात खासदार हे भाजपमध्ये सामील झाले आहेत. यामध्ये राघव चड्ढा यांच्यासह हरभजन सिंग यांचा देखील समावेश आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मोठा धक्का बसला आहे. पंजाबच्या भगवंत मान सरकारने माजी क्रिकेटपटू आणि राज्यसभा खासदार हरभजन सिंग यांच्या विरोधात एक मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने हरभजन सिंग यांची सुरक्षा काढून घेतली असून, आता त्यांच्या घराबाहेरून सुरक्षा कर्मचारी हटवण्यात आले आहेत. यापूर्वी हरभजन सिंग यांना ‘झेड-प्लस’ सुरक्षा पुरवण्यात येत होती.
जरी हरभजन सिंग यांनी स्वतः आम आदमी पार्टी सोडण्याचा निर्णय जाहीर केला नसला तरी, पक्षाचे राघव चड्ढा यांनी हा दावा केला होता. यानंतर मान सरकारने सुरक्षा काढून घेतली. यापूर्वी, शनिवारी आम आदमी पार्टीच्या (आप) कार्यकर्त्यांनी राज्यसभा सदस्य हरभजन सिंग, अशोक मित्तल आणि राजिंदर गुप्ता यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. त्यांच्या घराबाहेर गद्दार असे फलक लावण्यात आले होते. आगामी पंजाब निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा आपसाठी मोठा धक्का मानला जात असून यामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे.
हे देखील वाचा : Raghav Chadhha वर Gen-Z नाराज! BJP मध्ये प्रवेश करताच 10 लाख जणांनी केलं Unfollow
हरभजन सिंग झाले भाजपमध्ये सामील
राघव चड्ढा आणि संदीप पाठक यांनी शुक्रवारी आम आदमी पक्षाच्या इतर पाच खासदारांसह पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय जाहीर केला. आम आदमी पक्षाच्या इतर खासदारांमध्ये अशोक मित्तल, हरभजन सिंह, राजेंद्र गुप्ता, स्वाती मालीवाल आणि विक्रमजीत साहनी यांचा समावेश आहे. हरभजन सिंग या ‘आप’ खासदाराने आता पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लुधियाना आणि जालंधरमध्ये कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरांच्या भिंतींवर ‘देशद्रोही’ असे स्प्रे-पेंट केले. हरभजन सिंग यांच्या घरीही असाच संदेश लिहिलेला दिसून आला. या पक्षांतरामुळे पंजाबसह देशाच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा : ‘आप’मधील बंडावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “स्वार्थ आला की माणसं तुटतात, दोष संघटनेचाच”
आंदोलकांनी ‘पंजाबचा गद्दार’ अशी घोषणाबाजी
आंदोलकांनी ‘पंजाबचा गद्दार’ अशा घोषणा देत खासदारांवर पंजाबच्या जनतेशी गद्दारी केल्याचा आरोप केला. आम आदमी पक्षाचे नेते पवन कुमार टिनू जालंधरमध्ये म्हणाले, “२०२७ मध्ये ‘आप’ पंजाबमध्ये पुन्हा सत्तेवर येईल आणि भाजपला येथे कोणतेही राजकीय वजन राहणार नाही. हताश होऊन भाजपने ‘आप’च्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस, भाजप आणि अकाली दल यांनी ‘आप’च्या विरोधात आघाडी केली आहे, म्हणूनच त्यांच्या नेत्यांनी अशीच वक्तव्ये केली आहेत.”






