पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ; 'तृणमूल'च्या अध्यक्षपदावरून ममता बॅनर्जींनाच हटवले
कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर, पक्षांतर्गत बंडाला एक मोठे वळण लागले. उलुबेरिया पूर्वचे आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गटाने अभिषेक बॅनर्जी यांना पक्षातून निलंबित करण्याची आणि ममता बॅनर्जी यांना पक्षाच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची घोषणा केली. हा निर्णय बंडखोर गटाच्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. नेत्यांनी नवीन संघटनात्मक समितीच्या स्थापनेनंतर लगेचच एक ठराव मंजूर केला.
बंडखोर गटाने ज्येष्ठ आमदार अरूप रॉय यांची नव्याने स्थापन झालेल्या संघटनात्मक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. ऋतब्रता गटाची ही बैठक न्यू टाऊनमधील एका हॉटेलमध्ये झाली, ज्यात बंडखोर आमदार आणि कोलकाता महानगरपालिकेसह तीन जिल्ह्यांतील ७० ममता बॅनर्जी यांच्या जागी हावडा सेंट्रलचे आमदार अरूप रॉय यांची पक्षाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. अभिषेक बॅनर्जी यांच्या निलंबनानंतर, तृणमूल काँग्रेसचे खरे नेतृत्व आणि वैचारिक प्रभाव कोणाकडे आहे, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.
तृणमूल पक्षांतर्गत ‘घटनात्मक संकटावर’ तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती, असा दावा बंडखोर गटाने केला आहे. बैठकीला संबोधित करताना रिताव्रता बॅनर्जी म्हणाले, पक्षाच्या घटनेनुसार, राष्ट्रीय कार्यकारिणी समिती दर तीन वर्षांनी स्थापन करणे आवश्यक आहे आणि शेवटची अशी समिती फेब्रुवारी २०२२ मध्ये स्थापन करण्यात आली होती. पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पक्षाच्या संघटनात्मक रचनेची पुनर्रचना करण्यात आली नाही. त्यामुळे, पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक झाले.
‘तृणमूल’वर बंडखोरांनी मिळवला ताबा
ताज्या घडामोडींनंतर, तृणमूल काँग्रेस आता तीन गटांमध्ये विभागली गेल्याचे दिसत आहे. पहिला गट ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस; दुसरा गट ऋतब्रत बॅनर्जी यांचा आणि तिसरा गट म्हणजे काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखालील सुमारे दोन डझन लोकसभा खासदारांचा समूह, जे नॅशनल सिटिझन्स पार्टी नावाच्या एका लहान राजकीय पक्षात विलीन झाले आहेत.
1100 कोटींवरील हक्क
पक्षाच्या अंदाजे ११०० कोटी रुपयांच्या निधीवर कोणाचे हक्क असतील, याबाबतची परिस्थितीही अस्पष्ट आहे. बंडखोर आमदारांच्या एका गटाने अलीकडेच पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, तृणमूल कॉंग्रेसच्या तीन बँक खात्यांमध्ये जमा असलेल्या अंदाजे १४४० कोटींच्या निधीवर डेबिट फ्रीझ लावण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या खात्यांमधून पैसे काढता येणार नाहीत किंवा बाह्य व्यवहार करता येणार नाहीत.
बेकायदेशीर उत्पन्नाची पोलिसांकडे तक्रार
ऋतब्रता बॅनर्जी गटाच्या दहा आमदारांनी बिधाननगर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवून खात्यांची सविस्तर चौकशी करण्याची मागणी करत तक्रार दाखल केली आहे. या खात्यांमध्ये जमा झालेल्या निधीचा स्रोत संशयास्पद असून त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.






