Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“केंद्रात सरकार मोदींचं अन् सिस्टिम राहुल गांधींची चालली आहे…; खासदार राऊत नेमकं म्हणाले काय?

केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे अभिनंदन करुन मोदी सरकारवर निशाणा साधला.

  • By प्रीति माने
Updated On: May 01, 2025 | 01:13 PM
mp sanjay raut reaction on raj thackeray and uddhav Thackeray alliance in mumbai elections 2025

mp sanjay raut reaction on raj thackeray and uddhav Thackeray alliance in mumbai elections 2025

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : केंद्र सरकारने देशामध्ये जातीनिहाय जगगणना केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. मागील अनेक वर्षांपासून कॉंग्रेस पक्षाकडून जातीनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकार याबाबत सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे विरोधकांनी समाधान मानले आहे. याबाबत राज्यामध्ये देखील राजकारण सुरु झाले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार मोदींचे असले तरी सिस्टिम ही राहुल गांधींची असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

कमजोर महाराष्ट्राची श्वेतपत्रिका काढा

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. खासदार संजय राऊत म्हणाले की, “प्रगतीचा आढावा आणि प्रगती पुस्तकावर शेरा यात फरक आहे. दिल्लीपुढे झुकणारा महाराष्ट्र गेल्या तीन वर्षात निर्माण झाला. हिमालय कोण? हिमालय दिल्लीत उरलाय का? महाराष्ट्रात सहयाद्री कोण? एक सीएम आणि दोन डीसीएम हे महाराष्ट्राला आलेलं टेंगुळ आहे. एक टेकाड आहे, दोन टेंगुळं आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाच प्रगतीपुस्तक जाहीर केलं. ट्रम्पने सुद्धा अमेरिकेत 100 दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र किती कमजोर झाला, त्याची श्वेतपत्रिका काढा. 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याचा तुमचा अधिकार नाही, लायकी शब्द वापरणार नाही. 106 हुतात्म्यांच्या स्वप्नांना संपवून टाकलं. व्यापाऱ्यांना विकला गेलेला महाराष्ट्र निर्माण केला” अशा गंभीर शब्दांत खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले

पुढे त्यांनी केंद्रामध्ये जातीनिहाय जनगणना घेण्याच्या निर्णयाबाबत मत मांडले. खासदार राऊत म्हणाले की, “सरकार मोदींच, सिस्टिम राहुलची चाललं आहे. राहुल गांधी यांनी हा विषय उचलून धरल्यामुळे जातीय जनगणनेचा निर्णय झाला” असा दावा संजय राऊत यांनी केला. “पहलगाम हल्ल्यानंतर सरकारला प्रश्न विचारले जात आहेत. त्यावरुन समजाच लक्ष बाजूला व्हावं, म्हणून देश युद्धाच्या छायेत असताना, त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बिहार, पश्चिम बंगालची निवडणूक आहे. राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टेकावे लागले” असं संजय राऊत म्हणाले. “जातीय जनगणनेचा विषय राहुल गांधी यांनी उचलला. तो पर्यंत या देशातील जनतेला माहितही नव्हतं. विरोध भाजपचा होता. कॅबिनेटच्या निर्णयाच स्वागत करतो, राहुल गांधी यांचं अभिनंदन करतो” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

गुवाहाटीमध्ये मला धक्कादायक माहिती मिळाली

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावरील गृहप्रवेशावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, “सागर बंगल्यावर अभ्यास केला, म्हणून 92 टक्के मिळाले. मुख्यमंत्र्यांच्या मुलीला 92 टक्के म्हणजे महाराष्ट्राला 92 टक्के. ते आता वर्षावर गेलेत. मी त्यांना शुभेच्छा देतो. मला आशा आहे, तिथे गुवहाटीवरुन आणलेली जमिनीत पुरलेली शिंग बाहेर काढून विसर्जित केली असतील. त्यांच्या जीवनात सुख, शांती नांदो ही अपेक्षा. शिंग निघालीत का, ते पहावं लागेल, माझ्याकडे जास्त माहिती आहे. मी चार दिवसांपूर्वी गुवहाटीमध्ये होतो. तो अमावस्येचा दिवस होता. मंदिरात जाऊन मी चर्चा केली. मला मिळालेली माहिती धक्कादायक आहे” असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

Web Title: Mp sanjay raut press conference live news on caste wise census

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 01:12 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Rahul Gandhi
  • sanjay raut

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल
2

Narendra Modi : “सावध राहा, लोक आजकाल नेते पण चोरत आहेत,” नाव न घेता पंतप्रधान मोदींचा राहुल आणि तेजस्वी यांच्यावर हल्लाबोल

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली
3

Fadnavis On Rahul Gandhi: “राहुल गांधींच्या आजींनी…”; फडणवीसांनी ‘त्या’ वक्तव्याची हवाच काढली

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा
4

Rahul Gandhi as Shree Ram : विरोधी पक्षनेते राहुल गांधी अवतरले प्रभू श्री रामांच्या रुपात; UPमध्ये रंगली जोरदार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.